Sunday 18 June 2017

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना कोणीतरी खरडलेल्या इकडच्या वालच्या तिकडच्या वालवर कोपी पेस्ट केल्या. बरेच जण पावसाचा आनंद लुटायला लोणावळा , महाबळेश्वर किंवा आजूबाजूच्या डोंगरावर जायचे बेत करत आहेत.
पाऊस माझ्यासाठी फक्त महाबळेश्वर पाचगणीचाच , पण तो आजच्या टूरिस्टी नजरेतनं पाहिलेला नाही तर माझ्या लहानपणचा!
उन्हाळी सुट्ट्या संपताना जांभळं, आंबोळ्या , फणस , गोटी आंबे खाण्यात आम्ही मग्न असताना घराघरातल्या बाया नेचे आणि लाकडाचे भारे आणण्यात दिवसभर आजूबाजूच्या रानात असायच्या . सकाळी चार वाजता किर्र अंधारात नानी कास्टा घालून शेजारच्या बायांबरोबर जायची ती अकराच्या सुमारास डोक्यावर भारे घेऊन परतायची . मेच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या घरांना करकचून नेच्याच्या झड्या बांधल्या जायच्या, माळ्यावर बारकी- मोठी लाकडे तोडून रचली जायची आणि पुढच्या चार महिन्यासाठी महाबळेश्वर झड्यांच्या मागे दडून जायचे. पहिला पाऊस म्हणजे लाल मातीच्या रंगाने वाहणारे मोठमोठाले लोट, नेच्याचा भिजलेला कुंद वास, घरच्या पत्र्यांवर वाजणारा रप रप आवाज आणि शेगड्या चुलीच्या उबेत शेकणारी आबालवृद्ध मंडळी!
चार महिने शाळा बंद, पुण्या मुंबईचे कस्टमर आणि पर्यायाने धन्दापानी बंद, कोमटी, माळवदे , पुर्ण्याशेटची किराण्याची दुकाने फक्त चालू असायची. चार महिन्यासाठीचे बोंबील, सुकट भरलेली असल्यामुळे अगदी नाइलाज असेल तरच बाहेर पडायचे. बावडीवरून फक्त एक हंडा पिण्याच्या पाण्याचा घेऊन यायचा आणि बाकी सारी कामे पन्हाळीच्या पाण्याने व्हायची. दोन तीन दिवस सलग पाणी पडले की नंतरचे पाणी अगदी स्फटिकासारखे शुभ्र, पण बर्फासारखे थंड असायचे. मुन्सिपाल्टीच्या गटारातून कमरेइतके पाणी वाहत असले तरी खालचा मातीचा कण न कण दिसायचा. धुके इतके गर्द कि दोन हातावरचा माणूस दिसणेही अवघड, त्यात झड्या लावल्यामुळे घरात अगदीच अंधारून आलेले, पडवीतल्या चुलीसामोरचा उजेड आणि उब या दोन गोष्टीन्भोवती सगळा परिवार गुंफलेला असायचा . बिनाका गीत माला , रंगलेल्या गप्पा आणि गाणी , नाव, गावाच्या ,भेन्ड्यात मस्त संध्याकाळ जायची. एकाच गोष्टी साठी बाहेर जाण्याची सक्ती असायची आणि कसरत हि ..टिनपाट घेऊन- इरलं , गोणपाट आणि कधीतरी कोणा मोठ्या माणसाची छत्री मिळाली तर ती घेऊन खड्ड्यावर जावून दोन नंबर करणे. कितीही सावरून बसले तर हमखास भिजायचो. घरी नानी ओरडेल म्हणून झाल्या झाल्या पळत सुटलो तर बोळात शेवाळ साचून झालेल्या निसरड्या जागी पाय घसरून आपटी खाल्ल्यावर दुखणारे बुड , थंडी मुळे भरलेले कापरे यात कोणी काय ओरडले , काही फरक पडायचा नाही. बर्फाळलेल्या पाण्यात कपडे धुणे मग चुलीवर बांधलेल्या उतवावर आठ दिवस सुकवणे यासारखी शिक्षा बिचाऱ्या छोट्या मुमानीला दुसरी नसेल.
पहिला पाउस झाल्यावर नानी नेटाने रानात जाउन शेंडवळ आणि मुरड्याची भाजी घेऊन यायची. शेंडवळ दगडावर उगवणारी आणि मुरडा म्हणजे नेच्याचे कोवळे कोंब. त्या अगोदर उन्हाळ्यात चीचुर्ड्या चेचून त्याची भाजी , ही महा जहाल कडू असते . या तीन भाज्या सगळ्या पावसाळी आजाराची प्रतिबंधक औषधे होत.
माध्यमिक शाळा सुरु झाली तशी नानीच्या घरची सुट्टीची मौज संपली. पाचगणीत पावसात रस्तोरसती झरे फुटायचे. ते तुडवत जायची मजाच न्यारी. सगळ्या माळावर पांढरी गवतफुले उगवलेली , त्याच्या केलेल्या वेण्या, कोणीतरी घातलेला बकुळेचा गजरा यांनी वर्गातला मुलींकडचा भाग सुवासत असायचा . शाळेत गणपतीची आरास आणि प्रसाद यात सगळा ऑगस्ट मग्न असायचा आणि लगेचच सगळीकडे नवरात्रातले फेर धरून खेळणे व्हायचे . घरी बाबा संध्याकाळ झाली कि शेगडी पेटवायचे आणि एव्हाना दूरदर्शन आल्यामुळे जेवताना चित्त टी व्हीत लागलेले असायचे.
संजीवन मध्ये असताना डेस्कोलर ना दुपारी अडीच तास सुट्टी असायची , त्यात शाळेची इमारत बंद त्यामुळे मागच्या सगळ्या दऱ्या डोंगर , झरे पादाक्रांत करण्यात सगळ्यांचे रेनकोट पहिल्याच आठवड्यात बाद झालेले असायचे. पावसाच्या झडीत पूर्ण भिजून मग तसेच वर्गात बसण्यात फारच धाडसी वाटायचे.
तेव्हा पाचगणी महाबळेश्वरला कॉलेज नव्हते त्यामुळे सकाळच्या मश्वर पुणे गाडीने सगळे वाईच्या किसनवीरला. ज्यू. कोलेजची दोन वर्षे घाटातल्या पावसाळ्याची , एस टी च्या खिडक्यातून उडणार्या फवार्यांची. जूनच्या पहिल्या आठवड्यात अंकुरणारा , ओहोळणारा घाट जुलै ऑगस्ट मध्ये अनेक छोट्या मोठ्या धबधब्यांनी ओथम्बुन वाहता व्हायचा , झाडे ,दरडी कोसळणे नित्याचे असायचे. तोच घाट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये फुलून येणाऱ्या दिवाळीच्या सीजन चे स्वागत बहरलेल्या वृक्षराजीने करायचा . पाचगणी महाबळेश्वरची सगळी आर्थिक,सामाजिक व्यवस्था 'सीजन' या एका शब्दाभोवती गुंफलेली आहे. थंडी पडू लागली की नेपाळी स्वेटर वाल्यांची दुकाने अजूनच रंगीत दिसायची. झड्या निघून घरामध्ये सूर्यकिरणे पोहोचायची . डांबरी रस्त्यावर उन खायला आबाल्वृद्ध आवर्जून बाहेर यायचे . चार महिने आत राहून , शेकोटीच्या धुराने नखे आणि चेहरेही पिवळे पडलेले असायचे . मिट्ट काळोख्या संततधार रात्रीनंतर सकाळच्या कोवळ्या उन्हात जशी उल्हासाने पाखरे किलबीलतात तसे गल्ली, बोळ, सडका उन्हात गजबजून जायच्या. ईश्टापुरीच्या कावडी , घोड्यांची खोगीरे , नावांचे वल्हे असे सवंगडी ऊन खाणार्यांना सोबत करायचे. घोंगडी , वाकळा, घरांच्या पत्र्यावर सुकताना टाकलेले दिसलेकी पावसाळ्याची सांगता झाली असे समजायचे .

Thursday 18 May 2017

द्वाड

द्वाड

लहानपणापासूनच सगळ्या द्वाड पोरींशी मैत्री जरा लवकर होते असा अनुभव आहे. माझ्या स्वभावाचे प्रतिबिंब म्हणा किंवा सम कार्यकारणभाव भाव म्हणा, थोड्याबहुत उचापती मंडळींशीच गाठ जमून आली आहे. शहाण्या , सभ्य मुली काही आपल्या वाटेल जात नसत आणि त्यांच्या घरची वाट काही मला माहीत नसे , त्यामुळे कळत नकळत आणि आपला सहभाग असो नसो द्वाड गोष्टींचे खापर घरात आणि बाहेर आमच्याच डोक्यावर फुटायचे. छोट्या गावात राहिल्याचा एक फायदा नक्की असतो , सगळे सगळ्यांना ओळखून, एकमेकांवर नजर ठेवून असतात. समाजधर्माच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट पण त्यामुळे आमच्यासारख्यांची गोची - बऱ्याचदा काही गोष्टी करायच्या आधीच सगळ्या गावाला आणि पर्यायाने घर खान्दानाला त्या गोष्टीची माहिती झालेली असायची. नुसती बोलणी का मार यावरून आपण काय केलंय किंवा करणार होतो त्याची तीव्रता समोरच्याच्या दृष्टीने काय आहे, ते कळून यायची.
मी अकरावीला असताना कयामत से कयामत पिक्चर आला, आणि तोपर्यंत कॉलेजात नुसत्या चिठ्या देणाऱ्या आणि फिश पॉन्डच्या कार्यक्रमात आपली 'मन कि बात' जाहीर रीत्या सांगणाऱ्या मुली चक्क पळून जायला लागल्या. हे लोन बरेच महिने चालले होते. प्रॉब्लेम असा होता की एरवी सोबत हिंडत फिरत असूनही त्यातल्या बऱ्याच जणींनी ताकास तूर लावून दिली नव्हती. बऱ्याच वेळेस पाचगणीच्या मागच्या बाजूचा घाट उतरून , पाचवड मार्गे या पोरी फरार होत आणि त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या आया किंवा भाऊ दादालोग आमच्या घरात ठाण मांडून माझी उलटतपासणी सुरु करत तेव्हा मग मला सगळ्या गोष्टींचा उलगडा होत असे. आता आतंकवादी हल्ला झाल्यावर दुसऱ्याच दिवशी सगळे धागे दोरे, सूत्र , पुराव्यासकट एका दमात बाहेर पडतात, तसे काहीसे हे साक्षात्कार असत. खूप वर्षांनी अशाच एका पळून गेलेल्या जीवश्च कंठश्च मैत्रिणीशी आणि तिच्या पन्नाशीला आलेल्या अघळ पघळ सुटलेल्या नवऱ्याशी भेट झाली. तिला जेव्हा मी ती गेली त्या दिवशी तिची आई सगळे देव घेऊन आमच्या घरात येऊन रात्रभर त्या देवांना पाण्यात घालून आणि मला समोर बसवून , कुठे गेली माझी मुलगी सांग, असे विचारतानाचा सगळा सीन सांगत होते. मला कसं काही न सांगता तुम्ही गेलात अशी तक्रार केली तर तिचा प्रतिप्रश्न - पण तुला आधी सांगून काय प्लॅन फेल करायचा होता का ? हे ऐकून कितीही कंठाशी आलेली मैत्रीण असली तरी असल्या बाबतीत आपण विश्वासार्ह नव्हतो, हे मला पहिल्यांदा कळले .
New Thought Philosophy त Law of Attraction नावाचं एक प्रकरण आहे आणि त्याचा मतितार्थ थोडा वेगळा असला तरी माझ्या बाबतीत गाव, राज्य, देश , परदेश जिथे जिथे गेले तिथे जास्त अशा द्वाड मुलींचीच मैत्री झाली . रंग , रूप, भाषा , धर्म आणि राष्ट्रीयता याच्या परे एकच लघुत्तम साधारण विभाजक या सगळ्या पोरींमध्ये आहे आणि तो म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अधिकार (authority )पीठाबाबत अगदी बेदरकार बंडखोरी . ही या द्वाड पोरींत उपजतच असते का माहीत नाही पण अगदी पहिल्या भेटीपासून स्पष्टपणे कळून येते आणि पुढच्या मैत्रीचा अगदी पक्का धागा बनते ,हा आत्तापर्यंतचा अनुभव .
अनस्टेसीया इंटरव्हियूला आली त्या क्षणीच मला जाणवलं होतं , ही त्यातलीच एक . एक व्यक्ती म्हणून आवडणं आणि आपली सुपरवायझी असणं यात फार फरक असतो आणि त्यात जो बंडखोरपणा ती करेल तो आपल्या विरोधातच असेल हे माहीत असूनही तिला जॉब ऑफर करायचा मोह काही मला सुटला नाही. कारण या द्वाड पोरी जे काही करतात ते अगदी जीव ओतून करतात असाही आतापर्यंतचा अनुभव. त्यात जे कोणी ब्रिटिश सहकारी नसतात ते आपापल्या ethnic identities घेऊन जगतात कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असतो. जसे इथे इंडियन्स फार कष्टाळू (हार्डवोर्किंग) समजले जातात आणि म्हणून सगळ्या नोकऱ्यांत त्यांना प्राधान्य मिळते. मुळात कितीही काम करवून घेतले तरी चू करत नाहीत हे शिस्तप्रिय गोऱ्या साहेबांना दोनशे वर्षांपासून माहीत आहे . तो कॉलोनील धागा अजूनही कुठेतरी दोन्हीकडच्या मानसात ( mindset ) मुरलेला आहे. तसे मेडिटेरियन लोक त्यांच्या स्पष्ट आणि बरेचसे animated रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत . अनस्टेसीया ग्रीकची , इथे पंधरा वर्षे राहून पण ब्रिटिश समाजसंमत बोलाचालीत अगदीच ढ . तिला आणि तिच्या कामाला सांभाळणे मला फार अवघड जात नाही कारण तिने 'अरे 'केले की 'कारे 'शब्दात मलाही तिला खडसावता येते आणि तिच्यात विचार करून भांडायची जितकी गुर्मि आहे तितकीच आपल्याला काही माहीत नसेल तर जाऊन दोन चार पुस्तके वाचून, नाहीतरी आजच मला अर्धा तास देऊन हा नवा कायदा मला शिकव असं स्वतः शिकायची , आपलं काम सुधारायची उर्मि पण आहे . त्यामुळे कामात आणि असंही तिचं आणि माझं जमलं नसतं तर नवलच होतं .
मोठ्ठा प्रॉब्लेम तिचं ग्रुप मधल्या लोकांशी कसे पटणार हा होता कारण असले मुहफट लोक असले की काही जणांना त्यांनी काही नाही केले तरी insecure असुरक्षित वाटायला लागतं . आणि बाकीच्यांना असं काही वाटतंय किंवा वाटू शकतं याची हिला खबर ही नसते. ती टीम मध्ये आली आणि दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातच लोकांनी तक्रारी सुरु केल्या - ती फार जोरात बोलते , माझ्या केसमधल्या चुका काढते , तू नसली की दादागिरी करते इ इ . लीडर शिप मध्ये असल्याचा एक सगळ्यात मोठा तोटा असतो , समोरचा कितीही वायफळ बडबड करत असेल तरी ऐकून घयावे लागते, सर्वांना समजून घेऊन , त्यांची समजूत काढत , एकत्र पुढे जावं लागतं. बऱ्याच वेळा बाकीच्या लोकांची समजूत काढणे सोपे असते कारण मुळातच त्यांच्या आर्ग्युमेण्ट मध्ये दम नसतो, त्यांना जे काही खुपत असते ती मुद्द्याची गोष्ट नसतेच तर अनेस्थेसिया च्या विरोधात काहीतरी सांगायचे असते . या बाईला मात्र सगळ्या गोष्टींचा शहानिशा केल्याशिवाय चैन पडत नाही आणि बऱ्याच वेळा तिच्या ज्या तात्विक भूमिका असतात त्या सोडून पुढेही जाता येत नाही . परिणामी ही आपले आणि माझे काम सातत्याने वाढवत असते . कारण बऱ्याचवेळा इतके तिला कळते तर तीच का नाही ही केस घेत पासून , सगळं काही ऐकल्यावर खरं तर त्या केस वर्कर पेक्षा हिनेच जास्त अभ्यास केलाय आणि त्यामुळे मीच तिला म्हणते , तूच घेतेस का ही केस .असे करत टीममधल्या सगळ्यात कठीण केसेस हिच्या पदरात पडल्यात. आता ती टीम मीटिंगमध्ये दुसऱ्या कोणाच्या केसवर बोलायला लागली की दोघीनांही केस ट्रान्स्फर या टप्प्यावर संभाषण यायला लागलं की गाडी कुठे जाणार हे कळतं आणि वेळीच रिव्हर्स गियर टाकून, ज्याचे काम त्याला सुपूर्त करतो.
सगळ्या गोष्टी परफेक्ट करायच्या तर आपलं जीवन पण कसं परफेक्ट असायला हवं आणि त्यासाठी ही बया भरपूर वाचते आणि कष्टही घेते . त्यामुळे ती विगन आहे , बऱ्याचशा योगा आणि इतर पर्यायी जीवनशैलीच्या कार्यक्रमांची भोक्ती आहे. तिची राजकीय मते ठाम आहेत . शहरापासून लांब अशा संरक्षित कंट्री पार्क मध्ये एकटीच तिच्या असंख्य प्राण्यांच्या सोबतीने राहते . खूप मित्रमैत्रिणी आहेत पण हिच्या तत्वात बसणारा बॉयफ्रेंड नाहीये . मुलांची खूप आवड आहे त्यामुळे अर्धा डझन मैत्रिणींच्या मुलांची ही गॉडमदर आहे . बरं हे सगळे तिच्या आवडीच्या आणि तिला पटलेल्या गोष्टी आपणही कराव्यात असा तिचा आग्रहही असतो . मग एक दिवस सकाळ सकाळ बाटलीभर हिरवा द्रव पदार्थ घेऊन येईल - एक तिला आणि एक मला . हे काय तर स्पिनॅच मिल्क . तू खूप दमलेली दिसतेस आजकाल, याने फायदा होईल .ही वीगन असल्यामुळे साधं दुध व्यर्ज, बदाम ,ओटस ,हेजलनट चं दूध. मग मला तिला सांगावे लागते अगं या कॉम्बिनेशन मध्ये पालक खात नाहीत . त्याला थोडं तरी उकडावं लागत आणि इतकं दूध पालक प्याले तर मला माझा डेस्क टॉयलेटच्या शेजारी घेऊन जावा लागेल. मग अर्धा तास तिला काय कशाशी खातात ते सांगन्यात जातो .दुसऱ्या दिवशी मग आणखी नवा प्रयोग , परत काही सांगायचं तर हिचं खडसावण माझी बॉस आहेस, आई बनू नकोस . तिची आई माहित नाही मला , पण तिचे हे सगळे सत्याचे प्रयोग बघून आईची व्यथा नक्कीच कळते. परत ही आणखीन सांगणार कसे तिच्या घरात सगळे डॉक्टर आहेत आणि त्यांना आरोग्याबद्दल काहीच माहीत नाही. विविध हेल्थ प्रोडक्ट्स आणि डाएट्स यावर ती ऋतुजा दिवेकर जे पोटतिडकीने लिहीत असते ते हिला बघितले की कसे गरजेचे आहे हे मला गेल्या ८-१० महिन्यात खूप वेळा कळले आहे . बाहेर झीरोच्या खाली तापमान असले तरी dtox साठी दिवसभर काकडी आणि लिंबाचे पाणी पित राहणार . सर्दी झाली की कसले कसले हर्बल टी आजकाल टरमरिक टी ची लाट आहे. मंग बीन्स , आपले मूग ,कशी प्रोटीनयुक्त असते म्हणून ग्लूटन फ्री केकमध्ये घालणार , त्यात कुठेतरी इंडीयन घी वर आर्टीकल वाचलेले आठवून बटर ऐवजी मुक्तहस्ताने त्याचा वापर करणार. हे सगळे कमी म्हणून जो काही पदार्थ बनला तो डब्यातून बाहेर काढताना मोझेसच्या टेन कमांडमेंटस सारखे निरूपण ही करणार असं भन्नाट काहीतरी आख्खा वीकेंड खर्च करुन ती करत असते. यातून सुटका म्हणून मग आता तिने काही आणायच्या आत रात्री डबा करताना मीच जास्तीचा डबा घेऊन जाते तिच्यासाठी . एक तर तिचे भन्नाट प्रयोग त्यात सगळं महागडं ऑरगॅनिक घटकपदार्थ आणि एवढं मनापासून ती काहीतरी आणणार आणि मग मी तिला तिने जे वाचलं , ऐकलं आहे ते कसं चुकीचं आहे , ते सांगून तिचा भ्रमनिरास करणार त्यापेक्षा मीच तिच्यासाठी काही घेऊन जाणे परवडते. पण पर्यायी जीवनशैली आणि योगा या नावाने काय काय खपवतात याचे अगाध ज्ञान मला तिच्याकडून होत असते. बाहेर गुडूप अंधार आणि बर्फाळ हवेत संध्याकाळी ८. ३० ला काम आटोपून ती ज्या लगबगीने Sun Salutations अर्थात सूर्यनमस्कार घालायला निघत असते तेव्हा मला अगदी ओम अनस्टेशाय नमः म्हणून तिच्यासमोर लोटांगण घालावेसे वाटते .
हिच्या कामाचे जेव्हडे कौतुक होते तेवढ्याच बऱ्याच पालकांच्या तक्रारी ही येतात . अर्थात आमच्या कामात पालक तक्र्रार करतात म्हणजे तुम्ही तुमचे काम नीट करत असाल असा एक अलिखित नियम आहे . पण हिच्या बाबतीतल्या तक्रारी म्हणजे धम्माल असते . त्या सगळ्या तक्रारीना अधिकृत उत्तर द्यायची जबाबदारी माझी असते. बऱ्याच वेळा या तक्रारी ती लोकांना काय म्हणाली याबद्दल असतात. चिडली की सगळ्या ग्रीक भाषेतल्या म्हणी इंग्रजी भाषेत अनुवादित होऊन हिच्या संभाषणात येतात. एक तर शासकीय अधिकारी असल्यामुळे काय बोलावे, कसे बोलावे याचे नियम इथे फार कडक आहेत , त्यात सभ्य ब्रिटिश भाषेतील अगदी गुळमुळीत शब्दांनाही आम्हाला कायद्याच्या निकषावर तोलून मापून बोलावे लागते. कारण चुकीचं बोललं , नीट माहिती दिली नाही की अगणित चोकशा , दंड भरावा लागतो. असं असताना हिच्या ग्रीक भाषेत ही जे म्हणू इच्छिते त्याचे इंग्रजी भाषांतर आय विल किल यू असे होते पण त्याचा अर्थ मी तुला बघून घेईन याचयाशी जवळपास काहीतरी .. हे जेव्हा तक्रार निवारणासाठी आम्ही बसतो तेव्हा ती आरामात सांगते . इंग्रजीत म्हणा किंवा ग्रीक मध्ये म्हणा will kill you - समोरचयसाठी तेवढेच खतरनाक असते . पण एवढं होऊन पण लोकांना त्यांच्या केस वर तीच वर्कर म्हणून हवी असते . मग एक तिच्या वतीने , एक खात्याच्या वतीने माफीची दोन पत्रे जातात आणि गाडी परत रुळावर येते.
मी जिथे जिथे काम केले आहे तिथे तिथे थोड्या बहुत फरकाने अशा अनस्टेसीया भेटल्या आहेत . खूप जीव ओतून काम करणाऱ्या, खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणत कसलाही आडपडदा न ठेवता ऑफिस पॉलिटिक्स ची पर्वा न करता सडेतोड पणे काम करणाऱ्या आणि ऑफिस आणि प्रोफेशनल रिलेशन संपली तरी वैयक्तिक आयुष्यात अगदी जीवश्च कंठश्च झालेल्या. आधी खूप भारावून जायचे असं कोणी भेटलं की पण आता अनुभवातून आपल्याला लॉन्ग टर्म काही काम सातत्याने करायचे असेल तर अशा धडाडीच्या कार्यकर्त्यांबरोबर होयबा, नवशे, गवशे , थोडे कामचुकार आणि तक्रार करणारे असे सगळ्याच प्रकारचे लोक लागतात हे कळायला लागले आहे . त्याचबरोबर कितीही कोणी आवडले तरी सगळ्या टीम समोर एक ऑब्जेक्टिव्हिटी सांभाळावी लागतेच लागते. ऑफिसच्या बाहेर पर्सनल रिलेशन ठेवता येत नाहीत त्यामुळे एकूणच मैत्रीला मर्यादा येतात आमच्या. संध्याकाळी पाच नंतर बऱ्याच वेळा दोघी तिघी असतो ऑफिसात , तेव्हा पटापट रिपोर्ट्स संपवताना मग गप्पा रंगतात. काही कामाबद्दल , काही वैयक्तिक संदर्भातल्या , बऱ्याचशा इतर सहकार्यांबद्दल आणि इतर घडामोडींबद्दल . रोजच्या तशा नीरस आणि धकाधकीच्या जीवनात तगून राहायला जी चिकाटी लागते, रुटीन कामातही परिपूर्ण काम करण्यासाठीचा एक रेटा लागतो तो अशा सहकाऱ्यांकडूनच मिळत असतो. तिच्या इंटरव्ह्यू च्या वेळेस कुठेतरी हे अंधुक माहीत होते म्हणूनच तिची निवड केली होती मी . आता वर्षभराने ती निवड कितीही त्रासदायक असली तरी कशी योग्य होती याचा अनुभव घेत आहे . आज वर्ष झालं तिच्या आणि माझ्या अघोषित मैत्रीला, दोघी वाट बघतोय कधी एकदाचे ती किंवा मी हे ऑफिस सोडू म्हणजे मग खुल्लम खुल्ला दोस्ती का इजहार कर सके, पण त्याचबरोबर इतक्या वेगवेगळ्या केस वर आम्ही काम केलय आणि दोघी त्यातून इतकं शिकलोय की दोघींच्याही प्रोफेशनल प्रॅक्टिस साठी एकत्र जितकं काम करू तितके फायद्याचं आहे, अशी इकडं आड तिकडं विहीर अशी पण सुखद अडचण आहे समोर. आता द्वाड पोरी असल्या की अडचणीचं असणार ना , सगळं सुरळीत झालं तर उसमे कुछ मजा नै भाय !

February, 8th, 2017

Wednesday 17 May 2017

Saree

Growing up , I was never into girly stuff , rather enjoyed playing most of the games that were clearly meant for boys , often the only girl who was happily accepted in the neighborhood boys gangs based on only one merit ... Gurujinchee mulgi..
But the craze for the saree was there from very early years, initially wrapping around dupattas of older cousins to trying Ma's sarees when she was not at home. The professional choice and admission to TISs brought a very weird imagination of me in the eyes of my family. Until then , OMg what trouble this girl is going to invite next was the only thing that my family could think of about me! Of course, I had given them ample reasons to believe in my capabilities of causing havoc which in my mind was a successful rebellion. This ranged from breaking marriage engagements, going bald from long chotis to hiding at friends for all summer holidays to avoid further proposals of marriage. So me choosing social work and wearing sarees was a big relief for the troubled minds at home who gifted me white sarees for each occasion that year -be it a Eid or some cousin's wedding!
I loved all of them except the jazzy ones that were the latest craze of TV series in late 90s. My work with various NGOs took me to different parts of India and I returned with a local brand of saree from each visit ...Some of them gifted to me by local organisations but most found in local markets ...In those pre Google era finding about local crafts and vivid designs that always rooted in local history, geography and made from available resources was a discovery in itself . My wardrobe was gradually full of this vibrant representation of several mini Indias ...
Then I moved to the UK, carried some sarees with me here ...They remained at the bottom of suitcases in the absence of any occasion and due to the weather particular not suitable to wear them here. Every trip to India and sight of all those sarees hanging in the wardrobe , not touched for several months was difficult to bear. One such trip , I removed all of them and gave some to sisters, friends; keeping very few that are still difficult to part with .
Nowadays once a year comes an opportunity , an occasion thanks to some Indian/Asian friends who still believe in traditional stuff and arrange programmes where my sarees get to go ...
Today is one of them so here I am and my happy saree ...... 25th December, 2016

कवठाची चटणी

Trip to London is synonymous with going to East ham and along with enjoying south Indian food, buying loads of Indian sabji from grocery shops. These small shops cater to pan Indian population who visit here from various parts of London and surrounding counties.
Along with all other favorite sabji , always get kavath , woodapple ..I always find that name funny.. Obsessed empire named everything after their limited gyan of the world ...With no resemblance of any sort either in the appearance, structure, taste this largely wild fruit was named ,as some apple...Wood apple
With changing times and living context , the fruit that was always available in my mama's backyard ( परसात शेकड्याने पडलेली कवठे...to describe precisely)has become a luxury here ..

12th January, 2017

अलविदा .....My dear teacher

My initial months at TISS were full of discoveries of various sorts .. Ranging from the meaning of the word NGO that everyone was vehemently pronouncing in each discussion, debate, lectures to the projection of those 'chosen few souls' to impose how they are the ones who are going to bring in the revolution. Coming from a charity run disciplined hostel for rural pupils in pune, TISS hostel life appeared to me kind of anarchist. For few weeks, I was absolutely quite, not due to the fright or awe of this change but purely due to not knowing enough phrases in English and in modern social work professional terminology to throw in the conversations. I resorted to interactions with similar lost humble creatures who were largely termed as from SC ST background or from regional medium schools. The faculty members of TISS was another amusing lot for me which no where fitted into my concept (then) and the experience so far of various teachers in my life. Institutes' approach to teaching and being a post graduate student may have also contributed to this slightly disenchanted feeling but inspite of having very close relations with many faculty members , I still find it difficult to call them teachers!
Among this lot was a tall , well built lady wearing saree and somewhat serious look on her face. Popularly known as Chitale mam among the students , she was the designated faculty to teach case work, one of the key social work method subject . After few weeks, I was also told in that famous room no 4 amidst loud cheering , some sighs and some indifferent faces who had assembled to know their fieldwork placements, that she was my field work supervisor. Thus began our association and in that first year of placement, we often travelled together to Swadhar office in Chembur. I was at ease , as she spoke Marathi and discussions were held in jargon free terminology. I owe my learning about women's issues, movement and support services largely to my first year placement, discussions with Mam and her encouragement to see various initiatives in Mumbai and Maharashtra. She was part of founding initiatives of Stree Mukti Sanghatana and had first hand experiences of working with women requiring support in dealing with abusive relations and overall their empowerment. Her calm voice, patience listening and association with what is known as 'grass roots' helped me to distinguish from cacophonous radical feminist voices on the campus often borrowed from western academic books to the ground realities and initiatives to address them. The calmness in her personality was not as a result of omniscience in her field of work but often a reflection of her inadequacy - in knowledge, skills, information that led to her speaking slowly often stopping in between as she was lost for words or at times lost the track. Her age then was a factor too. But this inadequacy never turned into any complexes rather enabled joint thinking and finding solutions together. At times it was like she starting a sentence and after a pause, lost look on both our faces- we moved on completing it together or supporting each other to build on what was said. The humility was her strength and willingness to accept viewpoints of 20 year old novice made these at times boring sessions attractive to me.
There was another big pull that led me often to her room on the second floor of the academic building - books , Marathi books. She knew almost all books available in the Marathi section of the library with their isles, rack and Pin numbers. She searched and at times bought some books and magazines to read and share with me. This passion for sharing reading continued beyond TISS years . There are so many lived experiences that have been firmly set in my memories ranging from crying while reading Zadazadti ( well known Marathi novel on displacement issues) to giggling like two thirteen year olds reading translated version of Sheroshayari in Vikram Seth's suitable boy. In the second year , placement changed, I had not opted for any course that she was teaching but our interactions although reduced , continued with the same warmth.
My first job was with DFID project in Jalgaon that continued to bring me back to the campus for workshops, meetings etc. One such afternoon in between workshops, we met for Anna's Tea at TISS quadrangle. Disappointed with the experience at DFID project, I was explaining to her , how it was far from what I wanted to do. She told me about We Need YOu society, a small NGO by a group of socialists running education activities where she was a trustee. Next week, I was invited for the trust meeting and was offered a job. Navi Mumbai then was an emerging city and many TISS staff had bought properties in the subarbs of Navi Mumbai due to the proximity to the institute. We happened to find accommodation easily in one of the staff members flat in Airoli- few roads away from Mam's home.
Next three years, we not only worked together but partially lived together with my then husband being away on various project tours. Ours was an inter religious marriage and the doors of our families were closed to us. It did not matter to us then having that bravado of rebellion, gyan about life and bright dreamy eyes- looking back I have realised that I fared through those years of being in a relationship, setting up a home, managing work, home, pregnancy, childbirth so easily and happily because I had Mam and my other friends in my life. Others were friends but Mam played many roles- she was a maternal figure giving advice on relationship, family, food, child care , supporting me through many Harmonol phases - it all came so easy for her. She was a mentor at work, friend on many occasions - calling on a rainy evening to make and eat Bhaji together, going for a Marathi theatre or generally just come over why are you sleeping alone in your flat- lets watch some tele together. She has a maid Ratna who was the third person to join us in our giggles and foodie ventures. Mam was the one to arrange my baby shower(ओटीभरण ) and then reach within an hour with गरम वरण भात in the hospital after Manu's birth. Manu's first picture was taken by her and after the birth parents she was the one to hold Manu- the image of her talking to that tiny infant is engraved in my mind!
And then life happened , some upheavals in life that led us to change home, work taking me to different parts of Maharashtra. Sporadic meetings and telephone calls continued until one day when I reached her home, she opened the door and told me off - shaking in anger, her eyes full of tears - she told me- "I am not happy with what you have done and I do not know what to say to you. I do not wish to talk to you". Shocked but not surprised, I returned from the stairs - by then many people had reacted to the news of my divorce from absolutely 'ideal campus Hindu Muslim' marriage. With the profound sadness , I passed through that subarb for many years whenever in Mumbai , remembering fondly the time that we had spent together. Her reaction was raw but so was her previous expressions in happy times , without any filters, pretensions and having her own moral parameters!
Our contact was abruptly terminated but the connection remained and was reignited through facebook invite and message from her few years ago - followed by the first query about Manu and agreement to visit her when I was in Mumbai. It took few years for us to coordinate a visit as she spent most of her time in Uganda with her son's family. Four years ago, I went to see her , she opened the door and in that warm embrace everything was communicated- no questions asked, no explanations given just tears of missing each other for so many years . Ratna was there and my favourite steaming poha with accompnying garam masala chai-- giggles and laughs had to follow. We spent the whole afternoon, looking at her grandchildren's photos, talking about the changed navi mumbai, her work at TISS as Mahalakshmi Chair professor, working on two of her books and dynamics at the institute. She had grown old , her movements slower , speech was interrupted with constant cough but there was same enthusiam, same twinkle in her eye when she spoke about her work, the same innocence when she described about her grandson to my son who was with me , and same amusement when describing the politics in general and at TISS -- reflecting her guileless nature and naivety.
Wanting to stay over , I had to leave to catch up on my NRI -रात्र थोडी सोंगे फार -- visits. We promised to meet again during the next India visit and she reminded me again and again to come with Manu. This year, as soon as I booked the flight, I sent her message, there was no response . Knowing that she was not regular and at times not familiar with tehnical stuff, I decided to call her when in Mumbai. None of the calls responded, so I went to her home. The home was locked. I sent her message on Facebook again which was responded to after few weeks telling me that she was in Kampala . We chatted on FB , she inviting us to Kampala. On my birthday , I received further message and that was it...
Last week, woke up to the news of her passing away . My routine activities are on but feel that big loss within me that has led to so many tears , smiles, thinking about our relationship and wondering -- yes she has gone but part of her remains in me- the love, compassion, smiles, food, books discussions, theatre and movies that we shared together , her anger and our reunion has shaped me in so many ways, all this has become inseparable part of me -and that will always remain.
There are no words to capture the gratitude I feel for having met you and spend part of my life with you, Mam. Perhaps this line states some of the feelings --मुझमे जो कुछ अच्छा हैं , सब उसका हैं ....
अलविदा .....My dear teacher  11th January, 2017

26 January 2015

चौकातील ध्वजवंदन,
लिमलेटच्या गोळ्या,
बाबांच्या रेखीव अक्षरातील सुविचार,
पाठ केलेले तीन मिनिटांचे भाषण,
.. आवेशात म्हणलेले जनमनगण
गांधी, नेहरू, आंबेडकरांच्या हार घातलेल्या तसबीरी,
गावच्या पुढार्यांची मन लावून एैकलेली नारेबाजी,
संध्याकाळी टी व्हीअसलेल्या घरात 'उपकार' बघण्यासाठी झालेली गर्दी...
आणि पुढचे कित्येक आठवडे कंपासपेटीवर लावलेल्या झेंड्याकडे अभिमानाने बघत राहणे...
आता सगळेच धूसर,
फक्त आठवणी, बालपणच्या का विरत गेलेल्या स्वप्नांच्या...
खोलवर कुठेतरी घुमणारा आवाज...
शान न उसकी जाने पाये.....

बाबा

दोन आठवड्यापूर्वी भारतातून आयुर्वेदिक औषधे आली आणि त्याचबरोबर वैद्यबुवा- खरेतर वैद्यापोरगाच -ने लिहिलेली सुवाच्च अक्षरातील मराठीतील चिट्ठीही . कित्येक वर्षांनी असं हस्तलिखितातलं पञ हाती आलं या आधी २००५ सालच्या जुलैमध्ये बाबांचे शेवटचे आंतरदेशीय पञ आले होते , ते अजून जुन्या फाईलमध्ये आहे. त्यानंतर फोन इतके स्वस्त झाले आणि त्याचबरोबर संवाद संपून फक्त कोरड्या चौकशा नियमित होत राहिल्या. औषधांचे वेळापञक असली तरी हस्तलिखितातली ही 'वतन की चिठी फारच अस्वस्थ करून गेली. शनिवारची घरची सगळी कामं करताना होस्टेलला असताना आणि नंतर नोकरीनिमित्त इतर ठिकाणी नियमित माँ आणि बाबांची आलेली पञ राहून राहून मला आठवत होती. असं काही असलं की इथे कोणाशी बोलता येत नाही मग कुठेतरी लांब फेरफटका मारत आपलं आपल्याशीच बोलायची सवय झाली आहे आता. शनिवारची दुपार अशीच पूर्ण ब्रायटन मध्ये फिरत घालवली. पायाचे भ्रमण आणि आतले भ्रमण काहीही destination न ठरवता केले की अनेक नेहमीच्या वाटेवर असणाऱ्या पण इतर वेळी न जाणवणाऱ्या गोष्टी समोर यायला लागतात. या पत्रा तुन बाबा असेच जाणवायला लागले , त्यांची सुरेख वळणदार अक्षरातील वेगवेगळी पत्रे, त्यातला मजकूर , खाली केलेली सही यातून त्या जवळ जवळ वीस वर्षातल्या त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी आठवायला लागल्या. बाबा आणि माँ दोघांची पत्रे फार वेगळी असायची - दोघेही आपापल्या परीने आदर्शवादी. पत्रे जरी आम्हाला लिहिली असली तरी त्यांचे स्वतःचे मुक्तचिंतन त्यातून असायचे. बाबांच्या लिखाणात साने गुरुजी डोकावयाचें तर माँची पत्रे म्हणजे सुहास शिरवाळकरांना प्रेरणा देतील असे उताऱ्यावर उतारे असायचे . शनिवारी असे खूप उतारे, उपदेश , घरी चाललेल्या आणि आम्हाला कळवलेल्या घडामोडी , दोघांच्या अपेक्षा ,काही व्यथा असं सगळं डोळ्यासमोर यायला लागले होते . इतकी वर्ष डोक्याच्या कुठल्यातरी कप्प्यात नीट रचून ठेवलेला हा खजिना समोर येत होता , अजूनही बरंच काही आठवत होते. शनिवार -रविवारचा धबडगा संपून सोमवारपासून ऑफिस सुरु झाले पण मन असेच कुठेतरी भरकटत होते. बरेचसे हसवत होते पण खूप विषन्नहि वाटत होते.
काळ सकाळी सगळे आवरून ऑफिसला निघत होते , चहा घेताना घड्यलाकडे बघितले , २६ जानेवारी सकाळचे ७.३० . यादिवशी सकाळी वेगळीच गडबड घरी असायची. सात वाजताचे झेंडावंदन , माँ त्याआधी गुळातला शिरा करायची, बाबा तिच्या पांढऱ्या साडीला इस्त्री करत असायचे , कोपऱ्यात रेडिओवर आकाशवाणीवरून दिल्लीला चाललेल्या कार्यक्रमाचे निवेदन सुरु असायचे .. नेहमीच २६ जानेवारीला सकाळी हा सीन आठवतोच , काल अगदी रडायला आले. तेव्हापासूनची अस्वस्थता काही जात नव्हती. ऑफिस , घर , कामे , माहीचा अभ्यास , क्लास, फेसबुक , जुने फोटो सगळे करून झाले तरी सतत डोळे भरून येत होते. नाहीतरी इतकी थंडी आणि बाहेर उदासवाणं वातावरण आहे त्यामुळे seasonal disorder आहे , उद्या d vitamin घेतले कि बरे वाटेल असं म्हणून झोपायला गेले आणि एक एक लिंक लागायला लागली . शांतपणे दोन तास रडून झाले तेव्हा जाणवले गेल्या चार वर्षात बाबा गेले तेव्हापासून हे सगळे साठले होते. त्या दिवशी सकाळी साडेचारला तैयबचा फोन आला तेव्हा पहिला कोरडा प्रश्न तिला ," तू कसं घेऊन जाशील सांगलीहून पाचगणीला "? तिने पण नेहमीप्रमाणे " तू काळजी करू नकोस , ऍम्ब्युलन्स बोलावली आहे , मी घेऊन जाईन, तू माँ शी बोल ती घरी आहे, " अगदी शांतपणे सांगून पुढची सगळी तयारी तिने केली. नाहीतरी तीन महिन्यापासून बाबांना उचलून घेऊन हॉस्पटिटलमध्ये नेण्यापासून ते त्यादिवशी त्यांचा मृतदेह पाचगणीला घेऊन जाईपर्यंत तिनेच सगळे काही केले होते. मी सगळ्यापासून दूरदेशी त्यामुळे इतकी वर्षे घरच्या सर्व गोष्टी तिनेच समर्थपणे सांभाळल्या होत्या. दीड महिन्याआधी बाबा icu त गेले तेव्हा फोन करून मला सांगितले होते की आता तू येऊन जा, बाबा 'लाडक्या लेकीची' वाट बघतायत. जेव्हापासून आठवतं , तेव्हापासून 'बाबांची लाडकी' हे बिरुद नावामागे लागले आहे . हॉस्पिटलमधली पुढचे तीन आठवडे अनेक नातेवाईक ज्यांना मी २०-२५ वर्षे भेटले नव्हते आणि जे माझं नाव घ्यायला ही तयार नव्हते त्या सगळ्यांकडून पुन्हा पुन्हा तो शब्द ऐकत होते. बाबांची अवस्था मात्र बघवत नव्हती . सगळ्या नातेवाईक आणि बघायला येणाऱ्या गाववाल्याच्या गराड्यात कॉटवर त्यांना हात पाय बांधून ठेवले होते. कोणी कुराणपठण करत होते, कोणी जुन्या आठवणी काढून रडत होते , त्यांचा क्षीण झालेला हात हातात घेऊन मी बराच वेळ बसून होते , त्यांनी एकदा डोळे उघडून बघितले आणि पुन्हा आजूबाजूच्या कोलाहलात ते शांतपणे पडून राहिले. एक दोन दिवसात थोडीशी हालचाल जाणवली, आधी असंबंध वाटणारी बडबड थांबून त्यांनी मला ओळखले , कधी आलीस विचारलं? दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला असं बांधून ठेऊ नका , आंघोळ करायची आहे अस आर्त स्वरात विनवत होते . सगळ्या पट्ट्या सोडून एका वॉर्डबॉय च्या मदतीने त्यांना गरम पाण्याने आंघोळ घातली , डायपर मध्ये अस्वस्थ वाटतंय म्हणत होते, ते काढून टाकले, बाबा हसून म्हणाले मला माहीत होतं तूच ऐकशील माझं म्हणून ! पुढच्या तीन आठवड्यात बाबा घरी आले , पूर्ण बरे नव्हतेच, पण हॉस्पिटल मध्ये ठेवायची गरज नव्हती. माझी तीन आठवड्याची इमर्जन्सी रजा संपली होती आणि मला परतणं भाग होतं . मुलांची सोय करून १-२ महिन्यांची बिनपगारी रजा घेऊन परत जायचा प्लॅन होता , पण तोपर्यंत बाबा गेले होते.
घरात बाबा आणि पाचगणीला कुठेही असले की गुरुजींच्या अनेक आठवणी निघतात . बाबा सोळाव्या वर्षी मास्तर झाले आणि सातारा जिल्ह्याच्या अनेक गावात त्यांनी शिकवले . त्यांच्या हाताखालून चार पिढ्या तरी शिकल्या असतील, पण त्यांचे शिकवणे आणि गुरुजीपण फक्त शाळेपुरते मर्यादित नव्हते . तस त्यांच्या पदाला फार किंमत नव्हती आणि बाबा काही फार करिष्मा असलेले व्यक्तिमत्व वगैरे नव्हते. जात , धर्म, अर्थ आणि राजकारण या सगळ्यातच खालच्या उतरंडीवर असलेला हा माणूस ना तर अधिकाराने मोठा आणि ना कुठलाही दबदबा असणारा . त्यांच्या जहाल , मुलुखमैदान बायकोपुढे तर बऱ्याच वेळा ते केविलवाणे दिसायचे. पण एक होतं की ज्या कोणाला गरज असायची ते गुरुजींकडे मन मोकळे करायला यायचे, पैसा अडका पण काही फार नव्हता पण कुणाच्याही अडचणीला ते कधी नाही म्हणायचे नाहीत- नातेवाईकच असलं पाहिजे असं नाही . गावच्या राजकारणात , समाजकारणात गुरुजींचा सल्ला भलेही ना मानोत , पण त्यांच्या उपस्थिती शिवाय मिटींगा व्हायच्या नाहीत . गुरुजी अगदी लहानपणापासून काँग्रेसचे समर्थक , सातारा जिल्ह्यातली काँग्रेस म्हणजे भाऊसाहेब भिलारे आणि यशवंतराव चव्हाण आणि पुढे राष्ट्रवादीवाले . पण निवडणूक आली कि सगळ्या पक्षाचे बॅनर रात्र रात्र बसून गुरुजीच बनवणार , बऱ्याचवेळा आपले रंग खर्च करून. सगळ्या खानदान मध्ये कोणाचे शिक्षण , दवाखाना निघाला की आधी निसार भाई पण त्याचबरोबर नवऱ्याने टाकलेल्या बहिणीला , विधवा मेव्हणीला त्यांच्या कुटुंबियांना सर्वपरे मदत करण्यात माँ आणि बाबा असायचेच. लहानपणी अशी एकही आठवण नाही की फक्त आम्ही आणि आमचे कुटुंब असे राहिलोय , कोणी ना नकोनी काका , मामा , मावशांची मुले आमच्याकडे शिकायला होती आणि त्या सगळ्यांचे ते बाबा होते , सगळ्या मुलांचा लाड करणारे आणि कधीही कोणालाही एका अक्षराने त्यांनी दुखावले नाही . माँ चा संघर्ष मात्र फार वेगळा होता , सामाजिक आर्थिक आणि काही अंशी धार्मिक प्रथा च्या विरोधात ती अगदी ठामपणे उभी राहिली, मुलींच्या शिक्षणासाठी सगळ्यांशी ती भांडली , त्यामानाने तेव्हा बाबांचा काहीच स्टॅन्ड नसायचा . बऱ्याचवेळा मा आणि इतर भावंडे त्यांना त्यावरून टाकून बोलायचीही , पण त्यांनी प्रतिवाद असा केला नाही. मनातून खूप दुखी व्हायचे आणि बऱ्याचवेळा बोलून दाखवायचे , त्यांच्या पात्रातून ही व्यथा खूप व्यक्त व्हायची. मागे वळून पाहताना आता जाणवते की त्यांनी स्वतः पुढाकार घेतला नाही पण माँ ला आडकाठी ही केली नाही , शांतपणे काही वेळा नाईलाजास्तव का होईना ते तिच्या पाठी उभे राहिले हे खरे . घरी त्यांना कुठलेही काम व्यर्ज नव्हते. शेवटपर्यंत आपले कपडे हाताने धुवायचे. लहानपणी शर्ट पॅंटीत बघितलेले बाबा आठवतात पण नंतरच्या वर्षात नेहरु शर्ट आणि पायजमा आणि डोक्यावर टोपी...आयुष्यभर गांधी ९२-९३ नंतर जमाती. पण टोपी बदलली म्हणून बाबा फार काही बदलले नव्हते...आजूबाजूच्या बदलत्या समाजकारणात त्यांच्यासारख्यांची घुसमट आणि फरफट बघणे कलेषदायकच होते.
थोडी जाण आल्यावर नेहमी वाटायचे की आपले बाबा दुसऱ्या बापांसारखे नाहीयेत , आपल्याला मार्गदर्शन करणारे, पुढे होऊन हिरीरीने सगळं काही आखून रेखून देणार आपलं कोणी नाहीये . आज दोन मुलं वाढवतना हे अगदी प्रकर्षानं जाणवतं की असं आखून रेखून काही कोणाचं आयुष्य बनवू शकत नाही . बाबा प्रत्येक पावलावर सोबत होते , पुढचे पाऊल कुठे , कसे टाकायचे हे ना तर त्यांना माहीत होते ना मला . पण जशी पाऊले पुढे टाकत गेलो तसा मार्ग सापडत गेला . वाटेत बऱ्याच वेळा काटे लागले, वळणे लागली , स्वतःवरचा विश्वास कमी वाटला , मार्ग आणि आत्मविश्वास दिसला तरी आर्थिक कुवत कमी पडली अशा सर्व वेळी तारणहार म्हणून नाही पण सोबती म्हणून बाबा होतेच होते. या सर्व प्रवासात माझे सगळेच निर्णय त्यांना भावणारे , परवडणारे नव्हते त्या सगळ्याची किंमत हि त्यांनी मला न कळू देता चुकवली . तीन आठवडे हॉस्पिटल मध्ये आधी मला टाळणारे , टोमणे मारणअरे बरेचशे गावकी भावकी सांभाळणरे नातेवाईक जेव्हा माझ्याशी बोलू लागले तेव्हा मला माझ्या आंतरधर्मिय लग्नामुळे माँ बाबाना किती सामाजिक बहिष्कार आणि आर्थिक दंड बसला ते कळले. कितीही मनस्ताप झाला तरी जिथे जिथे मी नोकरीसाठी गेले तिथे बाबा माझ्या सोबतीला राहायला आले होते . त्यांचा आदर्शवादी उपदेश आणि राजकीय विश्लेषण याची आम्हा बहिणींनी कितीही खिल्ली उडवली तरी , बाबा बोलणारच आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं त्यांना त्यामुळे कौतुक असायचे . इंग्लडला आल्यावर आमच्या भेटी साहजिकच कमी झालय . त्यात त्यांना कमी ऐक्याला येऊ लागले तेव्हापासून फोनवर संभाषण पण सीमित झाले. हॉस्पिटलमध्ये असताना बोलता येत नव्हते पण पेपरमधल्या शरद पवारांचा फोटो बघून हातवारे करत त्यांनी त्यांचे भाकीत करून टाकले होते. इस बात पे खुश होके , तैयबाची नजर चुकवून त्यांना खूप दिवस हवा असणारा चहाचा एक घोट मी त्यांना दिला होता -- इतना तो बाबा के लिये बनता है -आयुष्यभर त्यांनी मा ची असांख्य बोलणी खाऊन हि सगळ्या मुलांना बेकरीचेपदार्थ , गोळ्या बिस्किटे नियमित स्वरूपात दिली होती. साताऱ्याला गेले की माझ्या साठी पालेकर बेकरीचे टोस्ट आणि लक्ष्मिनारायण चिवडा आणल्याशिवाय ते यायचे नाहीत . घरात सगळ्या मुलांना हा चिवडा 'बाबावाला चिवडा' म्हणूनच माहीत आहे.
बाबांचा मला किंवा कोणालाच घरी धाक किंवा दरारा वाटलं नाही, मला प्रेम आणि कणव मात्र जाणवायची. हळव्या आणि आदर्शवादी माणसाचं जे होतं , तेच बाबांचेही झाले . वैयक्तिक आणि सामाजिक जगात त्यांच्या आदर्शाप्रमाणे गोष्टी होणाऱ्या नव्हत्याच , त्याचे वैषम्य त्यांच्या बोलण्यातून , लिखाणातून जाणवायचे . आपण फार दुर्बळ ठरू लागलो आहोत हे त्यांच्या मनात ठसले होते आणि त्यांच्याप्रती आपुलकी जिव्हाळा असला तरी त्यांच्या संकल्पनेनुसार काही कोणी जगणार नव्हते . निवृत्तीनंतर त्यांना आपण निरुपयोगी आहोत हे खूप वाटत राहायचं . त्याचवेळी आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर असताना कदाचित आपला बाप अधिक खंबीर असता तर आपल्या आयुष्यात काही गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या असंही मला खूप वाटायचं . शेवटी आपला पितृसत्ताक समाज पुरुषाची , बापाची एक स्ट्रॉंग माचो अशीच प्रतिमा आपल्या मनात नकळत घडवत असतो . स्वतःच्या आयुष्याकडे बघताना जेव्हा psycho-dynamic perspective ने घटनांचे मूल्यमापन करताना आपल्याकडे strong male role model नाही अशी बऱ्याच काळ माझी धारणा होती.
मध्ये एक दोनद मनू फार विचलित झाली होती आणि फोनवर बोलताना म्हणाली आज बाबांची फार आठवण आली . लहानपणी खूप अस्वस्थ वाटले की मी त्यांच्या हाताला धरून बसायचे . त्यांच्या स्पर्शात एक दिलासा असायचा आणि मनूला आणि मला, दोघीना त्या स्पर्शाची , त्यांच्या रुजू नजरेची अशा वेळी आठवण येते. सगळी भावंडे - काका , मामा, मावशा, आत्या अशा सगळ्या भावंडांबरोबर बोलताना बाबांनी दिलेल्या ५/ १० पैशाच्या आठवणी, त्यांनी खांद्यावर बसून बाजार किंवा शाळेत नेल्याच्या आठवणी , कोणी ओरडले कि हळूच जवळघेऊन दिलासा देणाऱ्या त्यांच्या अनेक आठवणी निघतात . आमच्या सर्वांच्याच भावविश्वात या माणसाचे वेगळे आणि अढळ स्थान आहे कारण त्याच्यातले हळवेपण, जिव्हाळा आणि आपुलकीने आम्हा प्रत्येकातल्या ----it has touched our soul.
या सगळ्या गोतावळ्यात 'बाबांची लाडकी' म्हणवून घेण्यातलं सुख वेगळं च आहे आणि घराबाहेर पडलं की अजूनही 'गुरुजींची मुलगी' म्हणून पाचगणीत आणि पंचक्रोशीत मिळणारा भाव न्यारा आहे .
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपले आई बाप वेगळेपणाने कळू लागतात , बाबा असे आता उमगायला लागलेत आणि अधिकच जवळचे वाटू लागले आहेत. त्यांना हे सगळं काही सांगू नाही शकणार पण तशी संधी असती तरी कदाचित सांगू ही शकले नसते. आई बाप जसं लहान मुलाचं प्रत्येक नवं पाऊल , हसू, चालणं , उठणं , बोलणं अगदी मनात भरून ठेवतात , त्या प्रत्येक हालचालीबरोबर स्वतः पालक म्हणून घडत जातात, तसंच काही आता reverse process मध्ये माँ बाबा पालक म्हणून समजायला लागले आहेत and it is just so beautiful...

28th  January, 2017

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...