Wednesday, 17 May 2017

झाडाझडती ..

झाडाझडती ...
चार दिवस लेक आली होती , कामातून सुट्टी काढून छोट्या भावाच्या हाफ टर्म सुट्टीचे निमित्त साधून. प्रत्येक वेळी आली की आजकाल हेल्थ विषयावर नवीन काहीतरी शिकायला मिळते . अमुक तेल कसं तब्बेतीला घातक , कुठल्या कंपनीच्या कारभारामुळे कुठे अनेक शेतकरी बुडाले , कुठल्या पदार्थात काय प्रिजर्वेटिव्ह असतात , त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, अमुक तब्बेतीला कसं घातक आणि तमुक खाल्ले की काय व्हिटॅमिन्स मिळतात असा एकतर्फी संवाद असतो. सलग चार वर्षे शाळेच्या डिबेटिंग क्लबची ही अध्यक्ष असल्यामुळे संवाद हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही. प्रतिवाद, घणाघाती हल्ला आणि आपल्या वाक्चातुर्याने समोरच्याला नामोहरम करणे हे आतापर्यंत माझ्यावर झालेले प्रयोग असल्यामुळे शांत बसून ऐकले की विषय चटकन संपतो आणि उभयपक्षी कटुता राहत नाही हे अनेक अनुभवातून मिळालेले शहाणपण , त्यामुळे शांतपणे ऐकायचे , चार दिवस किचन हिच्या हाती सुपूर्द करायचे , ती सांगेल त्या मुव्हीज मस्त कोचावर बसून बघायच्या आणि तिच्या हातचे नवीन पदार्थ तिच्या तोंडून त्यांची नवलाई ऐकत खायचे हा आतापर्यंतचा ती आली की कार्यक्रम .
चार दिवसात हजारो गोष्टी करायच्या असतात अजून , नवीन टी कॅफे शोधून तिथे जाऊन चहा प्यायचा, इथे टी रूम्स हा मस्त अनुभव असतो त्यातही ब्रायटन सारख्या अगदी फंकी शहरात तर खूप सुंदर टी रूम्स आहेत . किटलीभर चहा आणि तिचं जे काही फॅड चालू असेल त्याप्रमाणे तिचा काहीतरी हर्बल टी घेत कधी पुस्तकांबद्दल , कधी लहानपणीच्या आठवणीबद्दल तर कधी शांतपणे ती तिच्या आणि मी माझ्या छोट्या लॅपटॉप किंवा फोनवर आपली कामं करत असतो. एक लांब फेरफटका आणि इथे आल्यापासून फार थंडी नसेल तर समुद्रावर जाऊन बसणं - these are some of our favorite things .
याशिवाय आणखी नेहमी होणारी गोष्ट म्हणजे झाडाझडती -- किचन मध्ये , माझ्या कपाटात , छोट्या कानातल्या , हातातल्या गोष्टी ठेवायच्या डब्ब्यांमध्ये आणि घरातल्या इतर ठिकाणीही . किचन मध्ये नेमकी ही आली की आऊट ऑफ डेट गोष्टी समोर येतात मग हे किती जुनं आहे , ते कसं वाईट आहे या सबबीखाली बऱ्याच गोष्टी कपाटातून कचऱ्यात जातात , तेच इतर ठिकाणच्या गोष्टींचे फक्त त्याला नाव मिळते डिक्लटर ! यात सोयीने यांच्या लहानपणच्या असंख्य गोष्टी मात्र येत नाहीत . किचन चे फार वाईट वाटत नाही कारण बहुतेक सगळ्या पडून राहणाऱ्या गोष्टी म्हणजे कोणीतरी दिलेला चांगला सॉस , पेस्ट अशा प्रकारातल्या असतात आणि त्या कोणीतरी जवळच्या व्यक्तीने दिल्यात त्यामुळेच घरी आलेल्या असतात . त्या सगळ्या जाऊन चार दिवसात हिचे जे काय फॅड असते त्याप्रमाणे नवीन ऑरगॅनिक गोष्टी घरी येतात , मस्त चार दिवस मिरवतात मग नेहमीप्रमाणे शनिवार सकाळ होते आणि मोठ्या कढईत पोहे आणि सोबत आलं , वेलची घालून गुळाचा चहा उकळायला ठेवला की या सगळ्या फॅड गोष्टी हिरमुसल्या होऊन मागे जातात . सौ सोनार की वर हा माझा रामबाण उपाय आहे . मग पोहे कसे व्हाईट राईस चा प्रकार आहे वगैरे वगैरे फालतू चर्चा मागे पडून सगळे जण आपापल्या प्लेट्स घेऊन बसतातच सोबत. त्या दिवशी नेमकी ही येणार म्हणून लांबच्या इंडियन दुकानातुन आणलेली भेंडी , गवार नाहीतर मेथीला मस्त फोडणी दिली जाते आणि आणलेल्या शेवग्याच्या शेंगा तुरीच्या डाळीत आमसुलाच्या फोडणीत शिजवल्या की ग्लूटेनबाबा झकमारत बाजूला जातो आणि पोळी नाहीतर भाकरी तव्यावरून गायब व्हायला लागतात. घरात असलेल्या चटण्या , लोणची छोट्या छोट्या भरण्यात पॅक करण्यात उरलेला दिवस जातो .
बऱ्याच वेळा मी नसताना सगळे कपाट उकरून कपड्यांना ट्राय केलेले असते , दागिन्यांचा डबा काढून त्यातल्या गोष्टी घालून आरशात मिरवून झालेले असते किंवा चालू असते . तिला बघितले की मीही अजून अशीच मा नाहीतर तैयब किंवा रितूच्या कपाटात शिरून असले उपदव्याप करते त्याची आठवण येते. त्यातल्या काही गोष्टी नकळत पॅक होतातच आणि असे करत करत माही जास्त किर किर करायला लागला की कळते हिचे जाणे जवळ आले आहे. या दोघांच्या इतक्या गोष्टी या चार दिवसात ठरलेल्या असतात त्या होणे अर्थात शक्य नसते , जायच्या क्षणापर्यंत पुढच्या वेळेस काय करायचे , ती तिथून काय करू शकते , बहुतेक गोष्टी ज्या मम्मा नाही म्हणणार अशी खात्री असते त्या सगळ्या गोष्टी ती ऑनलाईन ऑर्डर करू शकते हे भाऊरायाला माहित आहे त्यामुळे आजकाल डायरेकट हट्ट तिच्याकडेच असतो , त्यात ही घासाघाशी चाललेली असते दोघांची, पण शेवटी शेंडेफळाच्या कलानेच गोष्टी होतात.
आता गेली थोड्या वेळापूर्वी , मस्त मिठी मारून. आजकाल रडत नाही जाताना ती किंवा आम्ही कोणीच . सवय झाली आहे आता ती नसण्याची आणि वर्षभर प्रचंड घालमेल सहन करून हे ही स्वीकारलंय की लेक मोठी झाली आहे आता अशीच येणार चार दिवसासाठी , बरसणार आणि थोडं विरसून निघून जाणार आपल्या विश्वात , तू नाही का गेलीस अशीच आणि अजूनही समजतं पण अक्ख्या इंडिया ट्रिप मध्ये अर्धा नाहीतर एक दिवसच असतेस पांचगणीच्या घरी -- तिथे पण असंच कुणी वाट बघत असतंय .
तुझीच लेक ती अशी मनस्वी , स्वच्छंदच जगणार, तू कितीही प्रेमाने तिच्यासाठी म्हणून उभं केलेलं घर तिला बांधून थोडीच ठेवणार.. जाताना घरच्या इतर गोष्टींबरोबर माझ्या विचार आणि भाव भावनांचीही अशी नकळत थोडी झाडाझडती होते --- शहाणपण (wisdom ) कदाचित असच या झाडाझडतीतूनच येत असावं प्रत्येक पिढीला ...

11th February, 2017

Show mor

Paav Bhaji

There is no other example of a Jugaad that became one of the best signature dishes of Mumbai and now India . I am not sure of its origin but observing any thelewala in Mumbai making Pav bhaji on a big pan on a stove , you can very well understand it is a Jugaad of all left overs that was mixed together and Tadka Marke was served with greasy pieces of bread . Popularized with the only brand of butter available in 80s and 90s - Amul Pav Bhaji was being sold at each nuke and corner of Mumbai in short time. Each suburb of Mumbai has its own Famous Restaurant known for a version of Pav Bhaji and for a typical Mumbaikar Shivsagar Pav Bhaji and the smoky environs of the Juhu restaurant interiors will always have a special place in heart.
The dish does have a special place in my children's lives too but it is , 'Mamma's' Pav Bhaji which is no where near to what you get in Mumbai or else where . Both children love any version that is made which over the period have seen all vegetables that are grown under and above the soil - all sorts of turnips, parsnips, pumpkins , beans and all the vegetables that otherwise do not find any willing place in a plate is rattled together in a big pan with lots of plum tomatoes and served with brown seeded bread . It helps me immensely on a busy day when all vegetables cooked in a pressure cooker and saute in onions and tomatoes with some masala will keep the lunch and dinner ready and children happy at all meal times. Needless to say it tastes different at each time and this is attributed to the changing bread rather than the large amount of turnip or pumpkin that Mamma wanted to get rid off from her fridge. This wonderful dish not only helps Mamma to utilise all vegetables but also all Masalas that otherwise sit on the shelf for years- typically coming from various friends . So at times Mamma's Pav Bhaji contains Madras Sambhar Masala and it times it will have dry Rosemary - you gift a Masala to mamma and it ends up in Pav Bhaji as her routine cooking will only entertain the masala that her Mumma or Mom in Law sends for her !
The atmosphere is very happy around for the past half an hour with the announcement of Pav Bhaji and all homework is completed within minutes with smiling face - thanks to the aroma in the room .
With all my parenting , I am always faced with this quintessential question- all these variations are fine at home but how will your kids fare in the larger society out in open there . With Pav bhaji this fear turned very true when Manu visited Mumbai few years ago and was treated by a friend in a well known Pav Bhaji Joint . The instant message to me was, 'uh it just some potatoish paste and I could not taste any real 'Bhaji' in it'. That's the answer perhaps - you don't have to accept what masses accept gleefully. One has to look at actual bhaji in the dish rather than gulp any mixture that is served with onion and tomato pieces in the name of Pav Bhaji :)

माझी टर्किश माय

माझी टर्किश माय
लंडनला पहिल्यांदा आले तेव्हा हातात नोकरीचे पञ आणि चार दिवस राहायची एका बेड आणि ब्रेकफास्टच्या ठिकाणी सोय एवढेच होते. ना कोणी ओळखीचे आणि जे कोणी ओळखीच्यांच्या ओळखीचे त्यांचीही फार काही मदत करायची तयारी नव्हती. त्यामुळे तिथे पोहोचल्यावर बघुयात असा विचार म्हणण्यापेक्षा दुसरा पर्यायच नव्हता . नावाला शासकीय नोकरी पण तोपर्यत सरकारी कर्मचारी या प्राण्याबद्दल भारतात जे काही माहित होते , ते काहीच या देशात लागू पडत नाही, हे कळू लागले होते. सुरुवातीचे काही दिवस, आठवडे इकडे तिकडे काढल्यावर एक आत्येभाऊ इथे असल्याचा शोध लागला. वीस वर्षे कोणाशीच संपर्क नसल्यामुळे नावापलीकडे त्याची फार काही माहिती नव्हती. पण आवडत्या मामाची लेक म्हणून तू अगदी अगत्याने घ्यायला आला. त्याची बायको कुठल्यातरी कंपनीतून सहा महिन्याच्या प्रकल्पावर आली होती आणि तो तिच्याबरोबर लंडन फिरायला. बस्तान टेकायला जागा मिळाली. दोघांनी मिळून लंडनच्या पूर्व भागात एक फ्लॅट सहा महिन्यासाठी भाडयाने घेतला. त्या सहा महिन्यात शेअर मध्ये राहणे हा प्रकार बराच माहित झाला होता. तो जायच्या आधीच दुसऱ्या रूमची व्यवस्था झाली आणि मग काही महिने वेगवेगळ्या ठिकाणी रूम मिळेल तसं राहत गेले. यात एक गोष्ट लक्षात आली होती, ती म्हणजे आपल्या एकटीच्या पगारात फ्लॅट घेऊन राहणे परवडणार नाही आणि कामाच्या निमित्ताने बऱ्याच शाळा बघून झाल्या होत्या. कामाचे स्वरूपचं असे की जिथे जाल तिथे समस्याग्रस्त मुलं आणि कुटुंबच आधी बघायला मिळतात. अतिशय आलिशान , निदान भारताच्या तुलनेत आणि अद्ययावत सर्व सोयी आणि शैक्षणिक सुविधा असलेल्या शाळा जरी खूपच भारावून टाकणाऱ्या असल्या तरी कामाच्या निमित्ताने या शाळेत असलेले ड्रगस , गँग्स आणि अगदी १३-१४ वर्षाच्या प्रेग्नन्ट मुली हा मला धक्काच होता. शिक्षण मोफत असले तरी सकाळी आणि संध्याकाळी मला मनूसाठी काहीतरी सोय करावी लागणार होती आणि अशा चाईल्ड मायंडर चे दर माझ्या आवाक्याबाहेरचे होते. इथे येण्यासाठी- विजा तिकिटासाठी आलेला खर्चही कर्ज घेऊन केलेला होता , त्यामुळे त्याच्या पूर्तीसाठी काही बचत करणे जरुरीचे होतेच. मनूला तेव्हा होस्टेलला ठेवायचा निर्णय याच परिस्थितीत घ्यावा लागला आणि पुढचे सात आठ महिने मी शेअर रूम्समध्ये राहिले . बहुतेक सगळे शेअर करणारे विद्यार्थी किंवा भारतातून आय टी प्रोजेक्टवर येणारी मुले , ज्यांनी कधी घरची काडी पण इकडून तिकडे केली नसेल. साहजिकच स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब, आणि इथे तीन चार बेडरूमचे घर असले तरी एकच संडास, बाथरूम आणि तेही एकत्र . त्यामुळे दर दोन महिन्यांनी मी इस्टेट एजंटच्या ऑफिसच्या दारात. त्याला पैसे मिळत कमिशनचे पण त्यापलीकडेही बराच गप्पिष्ट होता तो त्यामुळेही वैतागून का होईना दुसरी रुम दाखवायला यायचा.
ईस्ट लंडन सारखी विविधता लंडनच्या इतर भागात नाही , सर्व पूर्वाश्रमीचे वासाहतिक देशातले नागरिक इथे आढळतील. माझ्या ऑफिसच्या भाषांतर विभागात एकूण ९६ भाषांमध्ये मदत करणारे लोक पटावर होते त्यावरून या विविधतेची कल्पना यावी . ईस्ट हॅम या प्रामुख्याने आशियायी समजल्या जाणाऱ्या उपनगराच्या या भागात काही रस्ते पाकिस्तानी, पंजाबी , काही गुजराती तर काही श्रीलंकन दुकानांनी व्यापले आहेत. हा इस्टेट एजंट श्रीलंकन होता आणि इतर भाऊबंदांप्रमाणे त्याच्याही ऑफिसात प्रभाकरन चा फोटो होता . कामाच्या ठिकाणी बांगलादेशी, काही पाकिस्तानी , मिरपुरी कश्मिरी या सगळ्यांना भारत व भारतीय कसे वाटतात याचे कुतूहल होतेच पण लंडन शहरात किती वेगवेगळ्या आधीच्या वसाहतीतुन आलेले लोक आपापली संस्कृती जपत, इथल्या मुख्य प्रवाहात सामील होत पण हातचे राखत जगत आहेत. हा सर्वच माझ्यासाठी विस्मयकारी अनुभव होता. त्यात कोणी गप्पा मारायला लागले की भीड वगैरेंशी माझा कधी संबंध नव्हता त्यामुळे हा एजंट आणि मी घरं कमी आणि पूर्व लंडनच्या सगळ्या वसाहती खूप बघायचो, घरं बघताना , इथली वेगळी दुकाने, हॉटेले आणि वेगवेगळ्या समाजाची प्रार्थनास्थळे, धार्मिक, राजकीय संस्थांची ऑफिसे असं त्यानं प्लॅन न केलेली सांस्कृतिक राजकीय ट्रिप या महिन्यांमध्ये केली होती . मग वेळेचं भान आलं की तो हमखास शिव्या द्यायचा , तू बोलायला लागलीस की सगळा वेळ जातो आणि काम काही होत नाही . लंडनमच्ये आम लंडनकर अगदी मोजकेच, विचारेल तेवढेच बोलणार. आपण बरे आपले काम बरे असा खास ब्रिटिश बाणा असलेल्या या अतिशय वेगवान शहरात गप्पा , मैत्री फार क्वचित , झालीच तर आपल्या विशिष्ट भाषिक, जातीय , धार्मिक , सामाजिक समुदायातच होते हे तोपर्यंत माहीत नव्हते पण फार कोणी मोकळेपणाने बोलत नाही , त्यामुळे इथल्या बोचऱ्या थंडीत एक अलिप्तता आणि एकटेपणा जाणवायला लागलाच होता . एका शनिवारी असाच या राजाचा फोन आला आणि त्याने एक घर बघायला बोलावले , तशी अर्ध्या तासात दोन बसेस बदलून मी त्याच्या हाफिसात पोहोचले. त्याचा अजून एक मित्र आणि त्याची फॅमिली समोर बसले होते . ओळख झाली आणि राजाने नवीन प्रस्ताव मांडला , यांना घर विकायचे आहे, तू घेऊन टाक, मी तुला प्रोसीजर सांगेन.
इथे येऊन वर्ष व्हायला आलं होतं . येताना सगळे जाऊयात, नवीन संसार सुरु करूयात या सगळ्या योजनेचे बारा वाजले होते . शाळा आणि खर्चाचा मेळ बसत नव्हता आणि इथल्या शाळेचे वातावरण बघून मनू खाजगी बोर्डिंग शाळेत गेली होती . तिची एका वर्षाची फी, तिचा आणि माझा यायचा जायचा खर्च हा कधीही कल्पना केली नव्हती इतका होता . नवरा चार महिने राहून, मला इथे करमत नाही म्हणून निघून गेला होता. त्याच्याबरोबर न जायच्या निर्णयाबरॊबरच आणखी एका मुलाला स्वतःच्या जबाबदारीवर या जगात आणायचा माझा निर्णय होता. या गोष्टी इतक्या जलद गतीने घडल्या होत्या की काही विचार करायला, उमजायला ही वेळ मिळाला नव्हता. तो प्रस्ताव ऐकून मला आधी राजा चेष्टा करतोय असेच वाटले. त्याने मात्र शांतपणे पेपर काढले , प्रोसीजर समजावली, तू जितकी घरं सहा महिन्यात बदलली आहेत, त्या गतीने तुझं कोणाशी पटेल असं वाटत नाही. चार महिन्यात छोट्या मुलासह शेअर मध्ये घर मिळणे फार अवघड होईल तुला, त्यामुळे थोडी गुंतवणूक करून तू तुझे घर घे आणि त्यात लॊजर ठेव, इतका खर्च येईल. आधीच्या सगळ्या घराच्या भाडेकरारासाठी राजाने माझे कामाचे आणि बँकेचे कागदपत्र पाहिले होते. त्यामुळे त्याला बँक, कर्ज या सगळ्या गोष्टी माहित होत्या. घर बघून तर येउयात म्हणून त्यांनी गाड्या काढल्या आणि या घराच्या प्रेमात पडले मी. मागे पुढे सुंदर गार्डन , आटोपशीर दोन खोल्या छोटं पण टुमदार घर. पण तिथे गेल्या गेल्या राजाच्या मित्राने शेजारणीशी ओळख करून दिली- या घराचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही शेजारीन -- ही या मायबरोबरची पहिली ओळख . तिने सगळ्यांना आग्रह करून चहा आणून दिला. दहा मिनिटे तो घरमालक, त्याची बायको आणि मुलगी या शेजारणीच्या गळ्यात पडून निरोप घेत होते, सगळ्यांचे डोळे पाणावलेले आणि या साठीतल्या बाईने त्या सगळयांना अगदी घट्ट आलिंगन देऊन त्यांचे मुके घेतलेले . माझ्या डोक्यात पैशाची आकडेवारी, कागदपत्रे , इतर जबाबदाऱ्या करताना आणखी एक कर्ज असे विचार त्यामुळे फार त्यांच्याकडे बघायला किंवा त्यांच्याबद्दल विचार करायला मला फुरसत नव्हती .
सगळ्या गोष्टी जुळवून आणायला सहा महिने जाणार होते , त्यात एक छोटं ऍग्रीमेंट करून पुढच्या दोन महिन्यात माझ्या दोन बॅगा घेऊन एका शनिवारी मी या घरी राहायला आले. होती तेव्हडी सगळी पुंजी पणाला लावून आणि मित्र मैत्रिणीकडून कर्ज घेऊन डिपोजीट आणि इतर कायदेशीर गोष्टीची तरतूद तर झाली होती , पण या घरात काहीही घ्यायला मला निदान ४-६ महिने थांबावे लागणार होते. आधीच्या घरमालकाचा जुना सोफा , पडदे, एक टेबल आणि दोन खुर्च्या या गोष्टी तो टाकून देणार त्या मी ठेऊन घेतल्या होत्या त्यावर गुजारा असणार होता. टिस मधून निघाल्यावर पहिले घर केले तेव्हा एक सतरंजी , चार भांडी आणि एक बॅग भरून कपडे या मानाने ही फार वाईट परिस्थिती नव्हती. त्यात माझे स्वतःचे घर आणि घाणेरड्या लोकांबरोबर आता शेअर मध्ये राहावे लागणार नाही याचे समाधान जास्त होते.
पहिल्या दिवशी मस्त त्या सोफ्यावर ताणून दिली , दुसऱ्या दिवशी सकाळी कोणीतरी जोरात दार वाजवले म्हणून उठले तर शेजारच्या आंटी उभ्या होत्या . यू ऑल राईट , टी ? म्हणून मला घरात बोलावलं . त्या क्षणापासून आतापर्यंतच्या असंख्य भेटीत यू ऑल राईट ? थँक यू थँक यू , मम्मी डॅडी सलाम , चिल्ड्रेन फाईन ! एवढ्या चार वाक्यापलीकडे आमचे प्रत्यक्ष संभाषण कधीच गेले नाही . पण झेहराच्या माध्यमातून दोघीना एकमेकींच्या चार पिढ्यांची आणि आवडी निवडीची इत्यंभूत माहिती आहे . त्या दिवशी सकाळी खूप उकळलेला टर्किश चाय त्यांनी छोट्या कपात दिला , आणि समोर मोट्ठी किटली भरून आणखी घे म्हणत बरंच काही टेबलावर ठेवले. त्यांना बरंच काही बोलायचे होते पण इंग्रजी येत नव्हते , घरात दुसरे कोणी नव्हते, अंकल टर्कीला त्यांच्या ट्रीपवर . मग त्यांनी झेहराला फोन लावला . स्पीकर फोनवर तिने चार पाच प्रश्न त्यांच्या वतीने विचारले . नवरा कुठेय? सामान कधी येणारेय ? किती महिन्याची गरोदर आहेस? इंडियन आहेस का वगैरे . झेहरा म्हणाली मी दुपारी येते, जेवण आमच्याकडेच कर. नाहीतरी माझ्याकडे सामान आणायला त्यादिवशी पैसे नव्हते आणि भांडी ही नव्हती . आंघोळ करून , थोडं आवरून दुपारी परत आंटींनी दार वाजवले. झेहरा आली होती आणि सोबत आदल्या रात्री केलेले सारमा आणि डोल्मा आणले होते . झेहराचे इंग्रजी ही असेतसेच होते. आंटी प्रश्नांचा भडीमार करत होत्या , ती निवडून एक एक प्रश्न विचारत होती , मग माझे उत्तर त्यांना समजावून सांगत होती . सगळी दुपार अशी खाण्या पिण्यात , मुख्यतः माझी चौकशी करण्यात गेली. दोघी माझ्या घरात आल्या आणि पुन्हा त्यांच्या घरात जाऊन चार भांडी , रग , एक दोन छोट्या बादल्या अशा काही बाही वस्तू घेऊन तुला लागतील म्हणून ठेवून गेल्या. त्या दिवशी संध्याकाळी खूप समाधानाने चार अश्रू ढाळले . या एवढ्या मोठ्या शहरात कोणीतरी आहे, सोबत आलेल्या भारतीय मैत्रिणी होत्या पण त्याही माझ्यासारख्या नवीन शहरात आपले बस्तान बसवण्याच्या आणि नोकरीत सामावून घेण्याच्या तिढ्यात अडकलेल्या. भारतातून येताना चौदा जण एकत्र आलेलो , प्रत्येकाची परिस्थिती आणि प्रायोरिटी वेगळी होती. फार मन मोकळे करून बोलता येईल अशी मैत्री झाली नव्हती आणि सांगता येईल अशी फार आशादायक परिस्थिती माझी नव्हतीच. एका पाठोपाठ एक सगळीच समीकरणे चुकत होती आणि पुढे काय कसे होईल याची काहीही कल्पना नव्हती . त्यात एक प्रेमळ शेजार मिळाला आणि त्यानंतर कधी या शहरात एकटेपणामुळे रडले असे झाले नाही .
हळूहळू बस्तान बसू लागले तसं आंटी आणि झहराबद्दल माहिती आणि आपुलकी वाढतच गेली . दोघी इतक्या सारख्या दिसतात आणि ती आंटींना माय मम असंच म्हणते, दर दोन तीन दिवसांनी त्यांच्या घरी येऊन कामात , स्वयंपाकात मदत करते त्यामुळे त्यांची ती लेकच आहे असा माझा समज . कधीतरी सहा महिन्याने कळलं की ती सून आहे आणि सतत भांडत राहणारा , ओरडणारा असगर त्यांचा मुलगा आहे . त्या दोघी जितक्या प्रेमळ, लाघवी तितकाच हा भांडखोर , सतत कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून गोंधळ घालणारा . सुरुवातीला खूप उध्दट पणे बोलायचा, एक दिवस आंटींनी चांगलंच झापलं तेव्हापासून थोडा सौम्य झाला आणि नंतर एक दिवस घरच्या भांडणात त्याने झेहरावर हात उचलला तेव्हा मी पोलीस बोलावले तेव्हापासून फार दबून राहायला लागला. हळू हळू ताण निवळला आणि थोडं जास्त कळायला लागलं तेव्हा माहीत झाले की तो मेंटल हेल्थ पेशंट आहे , माझा सगळा रवैय्या बदलला त्यांच्याकडे बघायचा. त्यात झेहराच्या छोट्या मुलाला ब्रेन ट्युमर आहे हे ही दोघींकडून कळलं होतं. ती निम्मे दिवस त्याच्या बरोबर हॉस्पिटल मध्ये असायची. मोठी दोन मुले आहेत. त्यांची मुलगी आणि मनू एकाच वयाच्या त्यामुळे मनू सुट्टीला यायला लागली आणि फक्त संध्याकाळ आणि वीकेंडचं नातं अगदी फुल टाईम घरोब्यात बदललं. माझे सगळे डोहाळे या सासू सुनेनी न विचारता पुरवले होते. माहिला जन्मापासूनच हे आजोळ मिळालं होतं. तो माझाच लेक त्यामुळे जगात यायची घाईच होती त्याला , वेळेच्या दीड महिना आधीच आला. त्या रात्री एकटीच घरी होते , एक लॉजर आणि त्याची बायको नुकतेच राहायला आले होते आणि स्कॉटलंडच्या ट्रीपवर गेले होते. रात्री अचानक पोटात दुखायला लागलं आणि इंटरनेटवर आधी सगळे सिम्प्टम वाचलेले असल्यामुळे कळलं अँब्युलन्स बोलवायला पाहिजे. हॉस्पिटल मध्ये जाईपर्यंत water बॅग फुटली होती आणि NHS स्टाफ खूप आश्वासक असला तरी एकटीच रात्रभर वेगवेळ्या मशीनवर पडले होते. मैत्रिणीना कळलं आणि बघायला येऊन गेल्या. हॉस्पिटल मध्ये काही कोणाला राहता येत नाही. प्रचंड वेदना होत असताना आजूबाजूच्या विव्हळणाऱ्या आणि किंचाळणाऱ्या बायांच्यामध्ये मी आपली जमेल तेवढी शांत विपश्यना करत पडून राहिले. नशीबाने पहिली वेळ नव्हती आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी माहित होत्या पण तरीही नवजात बाळाला आंघोळ, दूध पाजणं , झोपवणं आणि नंतरची हॉस्पिटल डिस्चार्जची प्रोसिजर करून बाळाला घेऊन घरी आले तेव्हा अगदीच दमले होते. निसर्गाची किमया खरंच अगाध आहे इतक्या श्रांत अवस्थेतही आपल्या लेकरासाठी इतकं प्रेम आणि माया येते , सगळ्या वेदना बाजूला ठेऊन त्याला घेऊन घरी आले त्या आधीच माझ्यासाठी शोर्मा बनवून या सासू सुना दोघी त्याला दृष्ट लागू नये म्हणून घरात एक निळा डोळा ( टर्किश आय ) बांधून गेल्या होत्या. आपल्याकडे भाकर ओवाळून टाकतात तसं काहीसं आंटींनी पाणी घेऊन केलं आणि छोट्याला मांडीवर घेऊन बराच वेळ बसल्या. त्याच्या जन्मानंतर चोथ्या दिवशी शांतपणे झोप लागली. नंतरची पाच वर्षे माही चालायला लागल्यापासून कुठूनही बाहेरून आला की पळत जाऊन त्यांचे दार आधी वाजवायचा . आंटींकडून त्याचा ठरलेला खाऊ घेऊन , मस्तपैकी त्यांच्या मिठीत शिरून भरपूर मुक्यांची देवाणघेवाण करूनच घरात यायचा .
माझ्याकडे जे जे कोणी पाहुणे, नातेवाईक आले त्या सगळ्यांना आंटींच्या घरी अगदी अगत्याचे आमंत्रण असतेच असते आणि या अगत्याची सुरुवात त्यांच्या मिठी आणि मुक्यांनी होते. छोटे , मोठे सगळेच त्यांना मुलासारखे, अगदी अजितसारखा अंगाने उभा आणि आडवा गडी पण त्यांच्या मिठीत सहज सामावून जातो. त्यांच्याशी संवाद करताना कधी कोणाला भाषेचा अडसर आला नाही कारण सगळी माया आणि प्रेम त्या मिठीत असते. पाच वर्षे लंडनच्या त्या घरात राहिले आणि एकही संध्याकाळ अशी नाही की मागच्या दाराने आम्ही काही देवाण घेवाण केली नाही . कसलीही फोडणी घातली की आंटी त्यांच्या गार्डन मध्ये येऊन उभ्या राहणार . सगळ्या भाज्या , आमट्या , त्यांच्याकडून वेगवेगळया मुरवलेल्या भाज्या, ब्रेडचे वेगवेगळे प्रकार इकडून तिकडे गेल्याशिवाय आमची जेवणे झाली नाहीत . वीकेंडला झेहरा आली की मग एकमेकींना मंगळवारी काय दिले त्याचे नाव, काय घातले ते घटकपदार्थ , बुधवारचा पराठा छान होता पण कमी दिला होता असा अहवाल मिळायचा. त्यांच्या आणि आपल्या खाद्यपदार्थात बरंच साम्य आहे ते त्यातूनच कळले आणि ज्या ज्या गोष्टी आवडल्या त्या आवर्जून शनिवार रविवार वेळ काढून शिकले आणि त्यांनाही शिकवल्या. आपल्या पराठयांसारखे ग्योझेलमा , ब्योरेक , डोलमा , पनीर चे वेगवेगळे पदार्थ, लस्सी , आणि हे सगळे करून खाऊन झाले कि चाय असा आमचा बेत ठरलेला असायचा . उन्हाळ्यात तर बाहेर दोन झाडांना दोर बांधून त्यावर रग टाकून सगळी मुले खेळायची आणि आम्ही एक एक बार्बेक्यू लावत राहायचो .
पहिल्या वर्षीच्या उन्हाळ्यात आणखी एक गोष्ट कळली होती ती म्हणजे मागच्या त्यांच्या गार्डनमधल्या चेरी , प्लम च्या झाडांचा बहर . उन्हाळ्याचे ते दोन महिने सकाळ संध्याकाळ चेरी , प्लम खाऊन इतकी सवय झाली आहे की गेल्या दहा वर्षात २/३ पौंड देऊन १०-१२ चेरी विकत घेणे हा जगातला सगळ्यात अक्षम्य गुन्हा आहे, असं माझं मत आहे. दरवर्षी न चुकता आम्ही अजूनही एक दिवस समरमधला रविवार काढून आंटीच्या घरी चेरी खायला जातोच. त्याचबरोबर कधी परातभर बटाटे , कांदे , वाटीभर स्ट्रॉबेरी मागच्या दारातून येत असायची. आंटी या सगळ्यासाठी मेहनत ही खूप घ्यायच्या पण ती सगळी मेहनत रात्री दोन वाजता सुरु व्हायची कारण त्यांना मायग्रेनचा त्रास होता त्यामुळे रात्री झोप यायची नाही . रात्री दोन अडीचला अगदी मागच्या पुढच्या गार्डनमध्ये दिवे लावून त्या झाडांना पाणी घाल , अळी काढ , मोठ्या फांद्या तोड अशी कामं करत राहायच्या. एरवी खुट्ट झालं की उठणारी मी या सगळ्या आवजात शांत झोपून जायची , भिंतीच्या पलीकडे आंटी असल्याचा मोठा दिलासा होता त्या घरात . सकाळ सकाळ ऑफिसला निघावे तर या शिडी लावून वरच्या खिडकीला रंग लाव , कौलं साफ कर असं काहीतरी करण्यात मग्न असायच्या . भरपूर काम आणि आहार त्यामुळे एकदम पैलवान असलेली ही बाई माही नर्सरीत निघाला म्हणून लगबगीनं शिडी उतरायला लागली की माझ्याच काळजात धस्स व्हायचं . परत वर हे काही सांगायची सोय नसायची कारण त्या स्पष्टीकरणात वेळ कोण घालवणार ? असे धस्स करणारे खूप प्रसंग आलेत त्या पाच वर्षात पण दोन अगदी स्मरणात राहिलेत .
रात्री तीन वाजता एकदा धाड धाड दार वाजवत आंटी आल्या आणि मला अगदी उठवून ,ओढत घरात घेऊन गेल्या . संपूर्ण घरात पाणी भरलं होतं . टॉर्च घेऊन त्यांचा वॉटर सप्लाय स्वीच शोधून काढायला अर्धा तास लागला मला . तो बंद केला , गुडघाभर पाण्यात दोघी बसून होतो , त्यांच्या मुलाला मी फोन करून सांगितले होते आणि तो अर्ध्या तासात येणार होतो. तो येईपर्यंत थांबणार होते, पाचच मिनिटे झाली आणि आंटी टी टी म्हणत किचनमध्ये गेल्या . गुडघाभर पाणी, सगळी वीज गेलेली त्यात त्या गॅस कुकर लावून चहा करणार होत्या , नक्की शॉर्ट सर्किट होऊन दोघी गेलो असतो . आंटींना समजावणार कोण आणि त्यांना बाहेर ओढणार तरी कसं ? माही उठेल, माझ्या घरी चहा करूयात हे कसतरी त्यांच्या डोक्यात घुसवलं आणि दोघी एकमेकींचा हात धरत त्या पाण्यातून बाहेर पडलो . दुसरा प्रसंग तीन चार वर्षानंतर अजित आलेला असताना आम्ही अगदी यावर्षी गार्डन करूयात म्हणून दोघेही दोन दिवस जमीन खणून , तण उपटून, छोट्या छोट्या वाफ्यात पेरण्या करत होतो . कौतुकाने आठ दहा प्रकारची फुलझाडे, भाज्यांचे बी आणले होते . आंटी प्रेमाने अगदी दोघांकडे बघत होत्या . मध्येच चहा आणून दिला मग गरम गरम चीज ब्रेड आणले मग काहीतरी सांगायला लागल्या. आमच्या दोघांना ही काहीच कळत नव्हते . दोघींच्या गार्डन मध्ये तारेचे कुंपण होते . या बाईने ढांग टाकून आली आणि माझ्या हातातले फावडे घेतले. खरा खरा माती ओढली आणि सगळं सपाट करून टाकलं . दोन दिवस आम्ही प्लॅन करून छोटे वाफे, फुलांचे ताटवे ,त्याला बॉर्डर असं जे काही आखून काम केले होते ते एका झटक्यात त्यांनी मिट्टी में मिला दिया . पुढचे सगळे आठवडे आम्ही मधूनच फुटणारे अंकुर बघून हे बघ हे लाल दिसतंय बीटरूट असेल, याचं पान पालकासारखा दिसतंय असा ओळ्खओळखीचा खेळ खेळत होतो.
लंडन सोडून केन्टला राहायला निघालो आणि दोघीनाही गहिवरून येणं साहजिक होतं . आंटी जरी रोजच्या शेजारीं असल्या तरी झेहरा नुसती अनुवादक राहिली नव्हती , अगदी जिवाभावाची सख्खी मैत्रीण झाली आहे ती. आम्ही दोघीही ,'तशा ' नसलो तरी तिचा अगदी पक्का प्लॅन आहे माझ्यासोबत राहायचा, मध्येच माझ्या आयुष्यात आणि मग घरात अजित टपकला , हे सहन करते ना करते तेवढ्यात मी घर बदलून दूर जाणार म्हणून खूप नाराज होती. अजूनही मधूनच टोमणेवजा निरोप आला की कळते , हिला काहीतरी मनातले बोलायचे आहे. संध्याकाळी गाडीतून फोन लावून गप्पा होतात मग आणि फोन ठेवताना हमखास डोळे पाणावतात. कधीही लंडनला गेले की यांच्याकडे जाणे होतेच. मधल्या काळात आंटींची डोकेदुखी बळावलीय , झेहराची दोन थयरॉईड आणि पोटातल्या ट्युमरचे एक ऑपरेशन झालंय . सगळा राग , गोंधळ आवरत असगर दोघींची त्याच्या परीने काळजी घेतोय. अंकल अजूनही टर्कीच्या वाऱ्या करतात वर्षातून दोन वेळा आणि मध्येच या दोघीना आठवण आली की खूप झालं तुझं इंग्लंड फिरणं , ये परत इल्फर्डला असा निरोप असतो. आंटींनी माझ्या दोन्ही पोरांची लग्ने ठरवून ठेवली आहेत नात्यात आणि अंकल नेहमी तुझ्या मुलीचं शिक्षण झालं की तुझ्या भावकीला भेटायला येणार आहोत याची आठवण करून देतात. त्यांच्यासाठी एक भावकी शोधावी लागेल आता ...
यांचं गाव आहे तुर्कस्तानमध्ये आणि घरात त्या गावातल्या एका मुल्लाचे फोटो आहेत. माही लहान असताना मनू त्याला मुल्ला नासीरुद्दीनच्या गोष्टी वाचून दाखवत होती . ते पुस्तक बघून अंकलनी विचारले की हा कोण माणूस ? मुल्लाचे वर्णन ऐकून आणि फोटो बघून मग त्यांच्या घरातल्या या फोटोबद्दल माहिती मिळाली , आपला मुल्ला नसरुद्दीन म्हणजेच त्यांचा होजा नसरुद्दीन . होजा म्हणजे शहाणा (wise ) माणूस पण त्याला अगदी संतमहात्म्यासारखं मानलं जातं . आंटीच्या घरात सगळीकडे त्याचे फोटो आहेत , गाढवावरून बसलेले पण. आपल्याकडे त्याच्या नावावर काहीही खपवले आहे , ओशो ने तर इतके काही की माझी मनोमन इच्छा आहे की ओशो आणि मुल्ला एकदा प्रत्यक्ष भेटावेत आणि या खपवलेल्या कथांची शहानिशा व्हावी... एरवी सुन्नी मुसलमान त्यांच्या घरात कोणाचे फोटो लावत नाहीत , हा मुल्ला त्या कट्टरपणाला पुरून उरला आहे , निदान या घरात तरी. एकदा यांच्या गावी जायचा प्लॅन आहे आंटींबरोबर या होजाचे घर बघायला ..
परवा सकाळी इथले शेजारी येऊन दार वाजवून विनंती करून गेले की सकाळ सकाळ इंडियन जेवण बनवत जाऊ नका आम्हाला वासाने त्रास होतो , तेव्हा वाटलं खरंच जावं परत या सख्ख्या शेजारांच्याकडे ... लंडन जरा जास्त दूर गेलंय , वेळ काढून जाइन लवकरच , नाहीतर समर येईलच थोड्या दिवसात , मग चेरी डे असेलच . त्या दिवशी आंटी नेमका गोझेलमचा कार्यक्रम काढतील . लहानपणी पुराणपोळ्यांचा कार्यक्रम जसा दिवसभर चालायचा तसा हा कार्यक्रम असतो , ठेवणीतली गाणी म्हणत या दोघी सासू सुना सरसर गोझेलमा लाटत , भाजत जातात आणि लहान थोर शेजारी बसून गरम ग्योझेलमचा आस्वाद घेत असतात . मलाही दोन चार लाटावे लागणार आणि ते आंटींच्या स्टॅंडर्ड नुसार झाले की त्यांचा स्टॅंडर्ड डायलॉग - कशाला लग्नाची घाई केलीस , इतका छान ग्योझेलमा लाटता येतो तुला , माझ्या नात्यात मिळालंच असतं कोणी ना कोणी ..
अशी ही नावाची शेजारींन , साता समुद्रापल्याड असलेलं माहेर मला हवं होतं तेव्हा ह्या मायच्या स्वरूपात , घरापासून दोन पावलावर मिळालं. तेव्हापासूनची मायेची बरसात अजून चालूच आहे. ना कधी भाषेचा अडसर ना संस्कृती , राष्ट्र याच्या सीमा. त्यांची बरसात अशी सगळ्यांवरच होत असते. माझी कॉलेजातली मैत्रीण , एका मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेची डायरेक्टर पण वैयक्तिक आयुष्यात फारच त्रासलेली , तिच्या दोन छोटुकल्या आई बाबाची भांडणे सुरु झाली की घाबरून मावशीला फोन करायच्या. दोन तास गाडी चालवून त्या पोरीना घरी आणायचा नित्याचा कार्यक्रम होता. इथे बाकी सगळं झकपक असलं तरी कुणाच्या कुशीत जाऊन रडता येईल , शांतपणे झोपता येईल अशी नाती नसतात मुलांना. एकदा असंच रेस्क्यू मिशनवर असताना या सखीला पण गाडीत घातलं आणि घरी घेऊन येत होते. तिच्या फ्लॅटवर राहिली असती तर अँब्युलन्स बोलवून मलाच तिला हॉस्पटिल मध्ये पाठवावं लागलं असतं. प्रोफेशनल ड्युटी अशा वेळी आडवी येतेच आणि तिचा मेंटल ब्रेकडाऊन मला रिपोर्ट करावा लागला असता . खूप पटकन मेंटल हेल्थ वाले आले असते तरी मला क्लिनिकल सायकोलॉजि इथे NHS मध्ये ज्यापद्धतीने प्रॅक्टिस करतात त्याच्या इफेक्टिव्हनेसवर प्रश्न आहेतच. मनोमन इच्छा होती की ही तिथे पोहोचू नये . भेदरलेल्या तिच्या दोन मुली आणि अतिशय विध्वंसक अवस्थेत असलेली मैत्रीण मागच्या सीटवर आणि थोडी घाबरलेली पण शांत असलेली मनू पुढे असं गाडी चालवत घरी येत होते. काय करावं असा विचार करताना गाडी आपसूक आंटीच्या घराकडे वळली आणि दार वाजवताच आंटींनी हिला कुशीत घेतले . काही सांगायची , बोलायची गरज नव्हती, मैत्रीण आणि तिच्या दोन्ही मुली आंटींना बिलगून अर्धा तास होत्या, या आधी कधीच न भेटलेल्या आणि काय प्रॉब्लेम आहे याच्याबद्दल एकही प्रश्न न विचारता अर्ध्या तासात खूप काही थेरपि त्या कुशीत घडली होती. झेहरा आलीच अर्ध्या तासात, सगळ्यांसाठी जेवण बनवले, पोरींना घेऊन केक बेक केला आणि मध्यरात्री चार ही पोरी गाडीत शांत पणे झोपून आम्ही घरी पोहोचलो. त्या क्रायसिस पॉईंट ला मला आंटीच आठवल्या. माझी माय मावशी असलेल्या ह्या बाईने प्रेमाची पाखर अतिशय नवख्या , काहीही माहित नसलेल्या पण अतिशय गरज असलेल्या या मैत्रिणीवर घातली होती - या नात्याला काय म्हणावे मला माहित नाही, त्या मायेला कुठल्या थेरपीत बांधावे ते मला कळत नाही. अशी माय माझ्या आणि माझ्या आप्तांच्या आयुष्यात आहे याबद्दल अतीव कृतज्ञतेपलीकडे फार विचार करणे आणि समजणे सोडून दिले आहे आता ...
आंटी आणि झेहराबरोबरचे हे काही फोटू

25th February

Chillie Pickle

It is very rare that I go out to eat and feel satiated specially in the UK. Most of the times , most of the food is stale, even though the boards outside claim freshly made - what it means is freshly baked or cooked from frozen, exceptions of some pizzerias .
Eating out Indian Food is a disaster as most of the dishes that you know -- not because of my mother's culinary skills but because one has traveled and eaten at different places and know what the authentic Indian food is. Most Indian restaurants are run by Bangladeshis and their food is not Indian or Asian because having many friends from that part of the subcontinent, I know what they cook and eat at home. As I respond to the waiters in these restaurant , I always ask do you also eat this food and equivocally they say ,' No'.
So with this history and having searched for 1/2 hour a place to eat in Brighton today after our venture in Sight Seeing of this town, with hungry husband relying on my recommendation to choose we enter this acclaimed place that all my office colleague highly speak of. The grotesque interior, decorated with variety of objects that have no geographical or cultural uniformity was not unique to this place and laughing at the ,' created Indian ness' we settled and looked at the menu.
There was a Railway thali on offer with an option of Kingsize Thali . After some deliberation and as our phones reminded several times that we have crossed the daily limit of 10000 steps, we thought, it will be a good choice to eat a wholesome thali. So we order, and it comes true to what I was told by my colleagues -- variety of dishes put together without any spice and less salt - It was authentic Indian looking food quintessentially prepared for British Taste, portioned for the postmodern men and women who think about their weight at each morsel and priced for the international tourists who flock the famous lanes of Brighton!
Disappointed is an understatement when it came to the portions . The waitress tried to explain the sabjis included in the thali. I ordered hot ricecakes aka stale idllis that were steamed from frozen and served with Shorba --- No it is not a spelling mistake, that is what menu card said, - it was beatroot Shorba with some sambhar masala added to it with some dry podi as a chatney ... AND NO GINGERLY OIL - what an insult to any south Indian !
Thali had choice of Aasetu himachal versions of Curries - Nepali Curry, Kerla Curry and Aubergene sabji -- this covers the pan India ... no argument about it!
The achar was eatable and so was the Popadam - perhaps only two things that you could call were true to their taste !
As we sat there in a famous Jubilee Square looking and contemplating what colonialism and globalization has done to our Thali - outside the audience was coming and filing in their wishes on this wall - Before I die ......
I did not write there, but Before I Die -- I am going to eat authentic Thali -- of course not in the Great Britain !

भारतीय परिप्रेक्ष्यात मुस्लिम प्रश्नांची मांडणी

भारतीय परिप्रेक्ष्यात मुस्लिम प्रश्नांची मांडणी - जी गेली ४-५ दशके पुरोगामी आणि प्रतिगामी दोन टोकाच्या भूमिकातुन मांडत आहेत आणि हा प्रश्न त्याच त्याच मुद्द्यांभोवती फिरत आहे - चार बायका, मुस्लिम पर्सनल कायदा / समान नागरी कायदा, अयोध्या विवाद आणि राष्ट्रवाद. सगळे ऐतिहासिक दाखले देऊन पुन्हा पुन्हा मुस्लिम कसे राष्ट्रवादी आहेत असं पुरोगामी सिद्ध करायचा आणि विरुद्ध बाजूने आणि आता तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमातून मुस्लिम कसे दहशतवादी आहेत याचे भक्कम पुरावे देऊन ही चर्चा चालूच चालूच आहे. भारतातला मुस्लिम समाज शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सगळ्याच बाबतीत बहुतांशी या तळागाळात असलेला स्वतःला दलितांपेक्षा वरचढ समजणारा पण वस्तुतः सर्वच निकषात त्यांच्या बरोबरीने मागासलेला किंबुहना दबलेला आहे. संविधानाच्या स्वरूपात भारताने सहा दशके आधी जो दस्तऐवज स्वीकारला त्याची अंमलबजावणी पहिली तीन चार दशके संथ होती , नंतर ऐशीच्या दशकात झालेल्या राजकीय आणि सामाजिक चळवळींनी त्याला थोडी धार दिली , पण गेल्या दोन दशकात एकूणच प्रतिगामी शक्ती वाढत आहेत आणि त्या सर्वच समाजात आहेत. मुस्लिम समाज याला अपवाद नाही . फक्त हिंदू बहुजनांचा मूलतत्त्ववाद वाढला म्हणून मुस्लिम प्रतिक्रिया आली , ही खूप सरधोपट मांडणी काही विचारवंत करतात आणि त्यात काही अंशी सत्यता आहे. ज्या प्रकारे धार्मिक उन्माद, दंगे आणि राजकारणाचं व्यावसायिक गुन्हेगारीकरण गेल्या दोन दशकात झालं आहे , त्यात समूहाला चिकटून राहून त्यातून येणाऱ्या सुरक्षितता या अंगाने हा जमातवाद समजू शकतो. पण हा जमातवाद आणि मूलतत्त्ववाद हा एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळीकडेच वाढताना दिसतोय , याची कारणमीमांसा आणि भारतीय परिप्रेक्ष्यात यातून पुढच्या दिशा समजण्याची प्रक्रिया एकूणच थंड किंवा दिसत नाहींच्या बरोबर आहे. पाश्चिमात्य राष्ट्रे - अमेरिका युरोप सगळीकडेच मूलतत्त्ववाद वाढतोय आणि त्याचे एक कारण म्हणजे गेल्या शतकात सुरु झालेली आधुनिकीकरणाची प्रक्रिया . भारत ही याला अपवाद नाही.
सामाजिक आणि राजकीय शास्त्रात आधुनिकता ( modernity ) म्हणजे मध्ययुगीन कालखंडातून सरंजामी व्यवस्था नाकारून भांडवली, वस्तुनिष्ठ, धर्मनिरपेक्ष अशा राष्ट्र-राज्याची संकल्पना. बहुतांशी राष्ट्रे या आधुनिकतेच्या अनुभवास त्याबरोबर येणाऱ्या स्वातंत्र्य आणि समूहाच्या सीमा ओलांडून व्यापक जगाशी सामाजिक संबंध प्रस्थापित करण्याच्या आव्हानात तोकडी पडताना दिसतात. आधुनिकतेचा हा प्रवास तसा अवघडच आहे कारण या प्रक्रीयेमेध्ये बरीच उलथापालथ होते. उत्पादकतेची पारंपारिक साधने जाउन औद्योगिकरण, शास्त्र आणि तंत्रज्ञानावर आधारित नवीन शोध, प्रशासनात आमुलाग्र बदल आणि याअनुषगाणे जीवनाच्या इतर क्षेत्रात येणारे सांस्कृतिक बदल यामुळे सम्जाअत असणाऱ्या प्रस्थापित समज, रूढी, सत्ताकेंद्रे आणि यावर अंकुश ठेवणाऱ्या व्यक्ती या सर्वांतच उलथापालथ होते. अस्तित्वात असणारी घडी आणि त्याबरोबर येणारी सुरक्षितता यांनाच तडा जातो. साहजिकपणे या सर्व बदलांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या राज्यशक्तीविरुद्ध असूया व असंतोष निर्माण होतो. परंतु आधुनिकतेमुळेच पूर्वीची संथ जीवनशैली बदलून गतिमान बदल दैनंदिन जीवनात होत असतो. प्रस्थापित घडी चिरडून नवोन्मेशि असा हा बदल लोकांना हवा असतो. आपल्याकडे रेल्वे आल्यानंतरचा बदल किंवा तीन दशकांपूर्वी ठाणे बेलापूर पट्ट्यात शहर वसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी झाल्या त्यामध्ये हा आधुनिकतेचा प्रवास स्पष्ट दिसून येतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हा बदल बहुतांशी राष्ट्रात आणि समाजात झालेला आणि लोकांना भावलेला दिसतो. भांडवलशाही ज्यावर आधारित आहे ते पैसा आणि नफा हे दोन घटक आधुनिकतेच्या मुळाशी अस्तात. या दोन घटकांना, जडवादी विचारसरणीला मात्र फार सहजरीत्या मान्य केले जाताना दिसत नाही, किंबुहना त्यांचा अस्वीकार व त्याविरुध्द संतापाची भावना या समाजांमध्ये दिसून येते.
अनेक आशियायी राष्ट्रात आधुनिकतेचा प्रवेश हा मुख्यतः वसाहतवादी राष्ट्रांच्या माध्यमातून झाला. हा बदल झपाट्याने आला असला तरी तिथल्या स्थानिक लोकांसाठी त्याचा स्विकार मानसिकदृष्ट्या बराच अवघड होता. या प्रक्रियेत अनेक नव्या संधी उपलब्ध होतात परंतु त्याची जबर किंमत हि स्थानिक जनतेस द्यावी लाग्ते. बाहेरून येणारे लोक नुसते वेगळे दिसत नाहीत तर त्यांचे आचारविचार ही वेगळे. या प्रक्रियेशी जे जुळवून घेऊ शकत नाहीत किंवा ज्यांना विविध कारणांमुळे यात स्थान नाही त्यांची मात्र गोची होते. भूतकाळातील आपल्या स्थानाबद्दल,राजकारण, अर्थकाराणा तल्या भूमिकांबद्दल कमालीचे ममत्व याच प्रकियेतुन निर्माण होते.प्रचलित व्यवस्थेत एक प्रकारची निश्चितता असते, समाजास संभाव्य घडामोडींबद्दल ठाम खात्री असते. परंतु आधुनिकतेच्या प्रक्रियेत मात्र अनेक अनिश्चित आणि असंभाव्य अशा क्रिया या संथ समाजात प्रवेश करतात. मानसिकदृष्ट्या समाजासाठी हे एक मोठे आव्हानच असते. जागतिकीकरणाची १९९१ साली सुरु झालेली प्रक्रिया , त्यातून पुढे आलेला नवश्रीमंत समाज आणि त्याच बरोबर भूतकाळाचे, संस्कृती आणि रुढीरिवाजांचे वाढते स्तोम हे या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला प्रतिसाद म्हणून निर्माण झालेली प्रक्रिया आहे.
अनिश्चितता मग ती दैनदिन जीवनातील किंवा आध्यात्मिक पातळीवरची असो समाजमानसात त्याचे पडसाद तीव्र असतात, त्याविरुद्ध येणाऱ्या प्रतिक्रिया तीक्ष्ण असतात, हे सगळीकडे आढळणारे सत्य आहे. एरिक फ्रॉम आणि डुरखाइम यांच्या लेखनातून या संकल्पनांचा वेध घेतलेला आहे. फ्रॉम त्याच्या Fear ऑफ Freedom या पुस्तकात फ्रॉम म्हणतो कि स्वातंत्र्य एक प्रकारे नकारात्मक असते- जाचक परंपरा, रूढी, शासन यांना नाकारून त्यातून येणारे स्वातंत्र्य ! परंतु या स्वतंत्रतेबरोबरच एक प्रकारचा अभाव, रिक्तताहि येते. डुरखायीमने याचे वर्णन Anomie असे केले आहे. या अवस्थेत व्यक्ती व समूहाला मार्गदर्शन करणारे सर्व ढाचे कोसळलेले असतात, समाजमानस आणि समाजव्यवस्थापन यांना बांधणारी यंत्रणा कोसळलेली असते. भूतकाळातील निश्चितता जाउन एक प्रकारची संदिग्धता येते. फ्रोमच्या मते या स्थितीला जर बदलायचे असेल तर नकारात्मक स्वातंत्र्याऐवजी सकारात्मक स्वातंत्र्य आवश्यक आहे. सकारात्मक स्वातंत्र्यात व्यक्ती रचनात्मक कामात सहभागी होते, इतरांबरोबर अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करते. ही सकारात्मक स्वातंत्र्याची ओढ ज्या समाजात तीव्र बदल होतात तिथे अधिक जोमाने असते याचे कारण म्हणजे येणाऱ्या बदलांना स्वीकारत पण लवकरात लवकर आधीच्या निश्चिततेच्या स्थितीत जाण्याची एक निकड या समाजात असते. परंतु या निकडीपायीच हे समाज एकाधिकारशाहीस अंगिकारताना दिसतात. एकाधिकारशाही किंवा हुकुमशाहीत लोकांना काय विचार करावा, कसे वागावे याबद्दल ठोस मार्गदर्शन मिळते. जुन्या समाजव्यवस्थेत असणारी निश्चितता, अधिकारीव्यवस्था आणि जगण्यावाग्ण्याच्या निश्चित पद्धती हुकुमशाहीच्या माध्यमातून निर्माण होतानाचा एक आभास समाजास मिळतो. हा निश्चीततेचा आभास,सामाजिक आणि राजकीय पातळीवरची निष्क्रिय पण दृढ अशी प्रतिमा अशा हुकुमशाही राजवटी प्रस्थापित महत्वाचा घटक असतो. भारतात याच प्रक्रियेने गेल्या काही वर्षात जोर धरलेला दिसतोय. सर्व राजकीय आणि सामाजिक व्यवस्था आणि आतापर्यंतची संविधान आणि संसदीय कार्यप्रणाली वर आधारित सर्वच संस्था , व्यवस्था या प्रक्रियेत ध्वस्त करणे , हा या प्रक्रियेचा अविभाज्य भाग असणार आहे. अर्थातच हे काम इतक्या खुलेपणाने न करता त्याला समाजमान्यता मिळवत पुढे न्यावे लागणार आणि या कामात मुस्लिम प्रश्न हा कळीचा असणार आहेच .
भारतातील मुस्लिम प्रश्न हा आता यापुढे देश आणि राष्ट्राच्या सीमारेखेत ठेवून समजणार किंवा सुटणारा नाही. आपल्याकडे पुरोगामी सामाजिक चळवळीने स्वातंत्र्योत्तर काळात बराच मोठा पल्ला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गाठला आहे . आज पुरोगामी हा शब्द आणि ते विचार मांडणारे यांची सातत्याने खिल्ली उडवली जात आहे . बरंचसं मंथन, आत्मपरीक्षण , वैषम्य , विवंचना याच्या गर्तेत सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते अडकलेले दिसतात , बऱ्याचदा निराशेबरोबर पराभूत स्वर ही ऐकायला येतात , रोज घडणाऱ्या घटना आणि एकूणच जो कोलाहल समाज आणि माध्यमात चालू आहे, त्याची ही एक प्रतिक्रिया आहे , संवेदनशील मनाची , कृतीची आणि काही मूल्यांची ती अभिव्यक्ती जरूर आहे पण ती पूर्णपणे वास्तवातवादी नाहीये - सध्याच्या स्थितीच्या आकलनात . आतापर्यंतच्या कामाच्या मूल्यमापनात आणि भविष्यनिर्मितीच्या कामात थोडी तोकडी पडणारी ती प्रतिक्रिया आहे . खूप त्रुटी आणि विसंगती असल्या तरी आतापर्यन्त जो राजकीय आणि सामाजिक पल्ला आपण गाठलेला आहे त्यातूनच उद्याच्या जगाची निर्मिती नव्या तत्वांवर करण्याची शक्ती या विचारात आहे आणि हे केवळ भारतीय म्हणून स्वप्नरंजन नाही तर काही मूल्ये, तत्त्वप्रणाली यांच्या आधारावर बांधलेले ठोकताळे आहेत. स्वातंत्र्य संग्रामातून पुढे आलेल्या मूल्यांवर आधारित देश आणि समाजाची नवनिर्मितीची एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून बांधणी काही अर्थानी खूप सक्षम रित्या केली गेली आहे . भारताबरोबर जे देश वसाहतवादाच्या कचाट्यातून मुक्त झाले त्यांचा आणि आपला तुलनात्मक अभ्यास केला तर ही गोष्ट ठळक पणे दिसून येते. निरपेक्षरीत्या आढावा घेतला तर खूप त्रुटी , विसंगती आहेतच आपल्या प्रवासात . धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी अर्थ आणि राज्यव्यवस्था या दोन्ही उद्दिष्टांबाबत कमालीची अनास्था आणि विद्वेष निर्माण झालेला दिसून येतो, हे असं का झालं याची मीमांसा आवश्यक आहे.
धर्म आणि धार्मिकतेला नाकारून आधुनिकता आणण्याचा , धर्मनिरपेक्षता आणण्याची तर्कनिष्ठ थोडी कर्कश पद्धती इथल्या सामाजिक चळवळींनी घेतली आणि एक मोठा समाज दुरावला गेला . एकात्मता आणण्याआधी विविधता समजावून घ्यावी लागते , आपण एकात्मतेच्या नावाखाली विविधता मग ती धार्मिक असो की वैचारिक नाकारत राहिलो. धर्म कर्मकांड नको म्हणत असताना आपल्या चळवळी मात्र अतिशय कुंठित , बंदिस्त झाल्या आणि वैचारिक किंवा कृतीतील आदानप्रदान कठीणच नाही तर अधिक कर्मठ झाले. वादावादाच्या भिंती इतक्या मोठ्या झाल्या की संवादाचा गळा घोटत एकमेकांच्यावर तुटून पाडण्यात आणि आपली शुचिता पुढे करण्यात बरीच शक्ती वाया गेली आहे. यापासून धडा घेऊन नवीन सर्वसमावेशक चळवळीची बांधणी करायला हवी आहे , किंबुहना ती काळाची गरज आहे. भारतीय अध्यात्मिक मानसाला शतकांची चिकित्सा आणि बंडखोरीची परंपरा आहे. बौद्ध , शाक्त , भक्ती , सुफी अशा वेगवेगळ्या परंपरा इथे निर्माण झाल्या त्या प्रचलित समाज आणि धर्मव्यवस्थेला नाकारून, त्याच्या विरोधात बंड पुकारून . त्यांना कालपरत्वे धर्म आणि तत्कालीन राजवटींनी सामावून घेतले , प्रसंगी उखडूनही लावले . पूर्व आशियायी प्रांतात बौद्ध विचार आणि उपासनाप्रणालीचा प्रचार प्रसार या प्रक्रियेतूनच झाला. इस्लामचे भारतात आगमन, इथल्या राज्यकर्त्या समाजाशी झालेला संघर्ष, त्यातून झालेले विविध प्रकारचे समझोते , नंतर पसरलेली राजवट आणि अर्थ समाजकारणावर झालेला त्याचा परिणाम यावर बरंचसं लिहिलं गेलं आहे. तो बदल सहा आठ शतकांचा बहुपदरी, बहुआयामी असा आहे. त्यानंतर ब्रिटिश राजवट, त्यांची फोडा आणि झोडा नीती, सर्वच समाजातील लोकांनी त्याविरुद्ध वेगवेगळ्या नेतृत्वाखाली केलेला संघर्ष , फाळणीच्या रक्तमय आठवणी आणि त्यातून नवराष्ट्र निर्मितीची प्रक्रिया या सर्व गोष्टींवर वेगवेगळ्या अंगाने लिखाण झालेले आहे . गेल्या तीन दशकात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत , तंत्रज्ञान आणि इतर देशांशी प्रवास, सहवास या गोष्टी झपाट्याने बदलल्या आहेत. भारतीय राजनीतीत, धोरणात आमूलाग्र बदल झालेला आहे परंतु मुस्लिम प्रश्नांची मांडणी पुरोगामी गटात अजूनही सत्तर - ऐशीच्या दशकातीलच राहिली आहे. या प्रश्नाचे आंतराराष्ट्रीय पैलू समजल्याशिवाय पुढची मांडणी आणि कृती अपुरी पडणार आहे.
मुस्लिम प्रश्नाचे पहिले आंतरराष्ट्रीय परिमाण म्हणजे इस्लाम, ख्रिस्ती आणि ज्यूडाइसम या तीन अब्राहमीक धर्मातला शतकांचा तिढा . इब्राहिम किंवा अब्राहमपासून सुरु होऊन प्रेषित मोहम्मदापर्यंत येऊन थांबलेल्या या तिन्ही धर्मांच्या तत्वप्रणालीत बरेच साम्य आहे, किंबुहना old टेस्टामेन्ट , न्यू टेस्टामेन्ट आणि कुराण यातील मूळ साचा एकच आहे. परंतु एका ठिकाणी उगम पावलेल्या आणि जगभर पसरलेल्या या धर्मप्रणालीतील संघर्ष हा त्यांच्या उगमापासून आहे तसा आहे . काळानुसार या धर्मयुद्धांचे स्वरूप बदलले आहे पण जागतिक पातळीवर जे राजकारण चालू आहे त्यात या तीन धर्मातील तिढा, एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याची शतकांची लालसा आणि जेरुसलेम या तिन्ही धर्मात महत्वाचे स्थान असलेले ठिकाणावर कब्जा करणे हा समान धागा आहे. दुसऱ्या महायुद्धात ज्यूंचे शिरकाण आणि इस्रायलची निर्मिती, त्यानंतर ज्यू आणि सेमिटीसम या विषयांवर पश्चिम युरोपची भूमिका बचावात्मक राहिली आहे. आज या राष्ट्रांत मुलतत्ववादी गट पुन्हा जोर धरू लागले आहेत आणि वेगळ्या पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोर्चे बांधणी सुरु आहे . मुस्लिम राष्ट्रे आणि समुदाय यांचे वैचारिक आणि इतर पातळीवर हनन ही याच कूटनीतीचा भाग आहे आणि या सर्व प्रक्रियेत भारताचे भौगोलिक आणि राजकीय स्थान आशियात फार महत्वाचे आहे. आंतराराष्ट्रीय मोर्चेबांधणीत आपण एक राष्ट्र म्हणून स्वतंत्र न राहता दाव्याला बांधले गेले आहोत आणि आंतरराष्ट्रीय घटना आणि राजनीती दोन्हीचे पडसाद इथे शतकानुशतके एकत्र राहिलेल्या दोन्ही समाजावर पडत आहेत, पडणार आहेत. येणाऱ्या काळात या आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्याला सोडून देश अंतर्गत घटनांचे विश्लेषण होऊच शकत नाही . मुंबई ताज हल्ला हा कसाब ला दिलेली बिर्याणी अशा क्षुल्लक गोष्टींभोवती गुंगवत ठेवण्याचे कसब आपल्या माध्यमांनी आणि राज्यकर्त्यांनी दाखवले आहेच आणि आपली राजकीय जागरूकताही यातून स्पष्ट झाली आहे.
दुसरा याचा पैलू म्हणजे मुस्लिम समाज हा तसा एकसंघ नाही. भारतात आणि जागतिक पातळीवर सुन्नी आणि शिया हा भेद आहेच. बहुदा शिया समाज हा कुठल्या ना कुठल्या धर्मगुरूंना मानतो, त्यामुळे तो खूप संघटित आहे . जागतिक आणि राष्ट्रीय दोन्ही ठिकाणी हा समाज संख्यात्मक दृष्ट्या छोटा आणि व्यावसायिक दृष्ट्या संघटित आहे. बोहरा, आगाखानी, इस्मायली ही काही उदाहरणे आणि जागतिक पातळीवर इराण. उरलेला सुन्नी समाज विखुरलेला आहेच पण यातही वेगवेगळे प्रवाह आहेत. आधुनिकतेच्या अंगिकारात या समाजाचे आणि जिथे तो बहुसंख्य आहे त्या देशांचे ढोबळ मानाने बघता चार प्रकारात विभाजन करता येईल. हे विभाजन फक्त सैद्धांतिक पातळीवर आहे- प्रत्यक्षात एकाच देशातही वेगवेगळे मतप्रवाह आहेत आणि त्यांचा देशाच्या धोरणांवर कमीजास्त फरक पडत असतो .
यातील पहिला मार्ग आहे तो पूर्णपणे पाश्चिमात्य देशांच्या अनुकरणाचा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९व्या शतकात तुर्कस्तान, इराण, इजिप्त असे देश. पाश्चात्य देशांत प्रचलित अर्थ- राज्य आणि प्रशासन व्यवस्था या देशांतील तत्कालीन सत्ताधारी आणि अधिकारी वर्गाला जवळची वाटतात. उदा कैरो विद्यापीठाची स्थापना झाल्यावर इथे इस्लामिक धर्मशास्त्राऐवजी आधुनिक शास्त्रांचा अभ्यास सुरु केला गेला . ओटोमान साम्रज्याच्या लष्करी प्रशिक्षणात, संघटनात्मक बांधणी आणि संरचनेत जर्मनीचा मोठा सहभाग दिसून येतो. ओटोमान साम्राज्यात या अनुकरनास तन्झीमात- सुधाराची चळवळ असे नाव दिले आहे. या चळवळीच्या प्रमुखपदी सुरुवातीला तत्कालीन सुलतान होता परंतु लवकरच एका तरुण मिलिटरी अधिकाऱ्याने आपण आणखी गतीने हे बदल घडवून आणले पाहिजेत या उद्देशाने बदलाची सूत्रे हाती घेतली. हा तरुण, मुस्तफा केमाल पाशा पुढे अतातुर्क - तुर्कांचा पिता म्हणून ओळखला जाऊ लागला. केमाल पाशा आणि त्याच्या तरुणतुर्क सहकाऱ्यांनी तन्झीमातचा विचार सोडून फ्रान्सच्या धर्तीवर आधारित धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाची घोषणा आणि स्थापना पहिल्या महायुद्धादरम्यान केली. तुर्कस्थानात गेल्या दहा वर्षात धर्माचे सामाजिक जीवनात स्थान या विषयावर चर्चा आणि बदल चालूच आहे. परंतु संपूर्ण अनुकरण यामार्गे आधुनिकतेचा अंगीकार हा पहिला दृष्टीकोन होय -यात धर्मनिरपेक्ष समाजरचना अंगभूत आहे.
आधुनिकतेच्या अंगीकारातला दुसरा दृष्टीकोन हा धार्मिक उदारमतवाद हा आहे. नवीन बदलांना आत्मसात करताना आधीच्या प्रथा, परंपरा आणि धर्म यांना बाजूला सारण्याची गरज नाही. धर्मपरंपरांमध्ये आवश्यक ते बदल आणून आधुनिकतेमुळे येणारी आव्हाने स्वीकारण्याचा हा गट पुरस्कार करतो. या गटाचे प्रतिनिधित्व मोरोक्को आणि ट्युनिशिया हे देश करताना दिसतात. इस्लाम हा सर्वसमावेशी धर्म असून तो आधुनिकतेसही अंगिकारू शकतो, नवीन आव्हाने असली तरी मुख्यतः इस्लामिक कायद्यात विशद केलेल्या संकल्पनांची पुनर्मांडणी करून त्या आव्हानांवर मात करू शकतो अशी या दृष्टिकोनावर आधारित धारणा. मुस्लिमजगतात सर्वात प्रभावी असा हा मतप्रवाह. येणाऱ्या काळानुसार बदल आवश्यक आहेत आणि ते बदल इस्लामिक कायद्याचे विवेचन, स्पष्टीकरण देऊन कायद्याच्या आधारावर संमत होऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ट्युनिशिया, मोरोक्को ५७-५८ मध्ये कौटुंबिक कायद्यात केलेले बदल. मोरोक्कोत हेच बदल २००४ मध्ये पुन्हा करण्यात आले. कौटुंबिक कायदे असोत किंवा इतर क्षेत्रातील बदल असोत अनेक मुस्लिम विचारवंत इस्लामचे वेगळ्या अंगाने स्पष्टीकरण देऊन अनेक असे बदल सामावून घेतात. परंतु या दृष्टीकोनात इसलाम आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सार्वजनिक कायद्यांचीच सर्वोच्चता मानली जाते.
तिसरा दृष्टीकोन हा परम्परावाद्यांचा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सौदी अरेबिया आणि इतर गल्फ देश. यांची मांडणी आणि दृष्टीकोन म्हणजे आम्हाला बदलाची काहीही गरज नाही. इस्लामिक शासन आणि इस्लामिक समाज हा आपल्या जागी फक्त योग्यच नव्हे तर इतर समाजांपेक्षा आणि विशेषतः पतित अशा पाश्चात्य देशांच्या तुलनेत उत्कृष्ट आहे. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ हे नेहमी आधुनिक जीवनाच्या काही बाबींचा उल्लेख करत असतात उदा. घटस्फोटाचे वाढते प्रमाण, कौटुंबिक जीवनाचा ऱ्हास, वेश्याव्यवसाय ई. अन्य समाजांच्या तुलनेत मुस्लिम समाज किती स्थिर आणि सुयोग्य आहेत कारण त्यांची बांधणी इस्लामिक कायद्यावर आधारित आहे. असा कायदा जो सर्वसमावेशक आणि जीवनाच्या सर्व पैलूंना विधिवत नियंत्रित करणारा आहे. त्यामुळे परंपरागत किंवा आधुनिक आव्हान असो -आम्हाला बदलायची गरजच नाही. आधुनिकतेच्या प्रक्रियेत येणाऱ्या अनेक तन्त्रज्ञानावर आधारित अनेक बदल मात्र यांनी अंगिकारले आहेत. हे तन्त्रज्ञान चालवण्यासाठी लागणारी मानवी संसाधनेही हे समाज आयात करतात. पाश्चात्य देशातील बनणाऱ्या सर्व सुख सुविधांचा उपभोग या देशात सर्रास केला जातो परंतु तेथील समाजाचे नियमन मात्र ते पूर्णपणे या प्रक्रियांपासून अलिप्त राहून करतात.
चौथा आणि सर्वात महत्वाचा गट - महत्वाचा यासाठी के मुसलीम आणि इतर समाजात हा गट राजकीय मंचावर जास्त चर्चिलेला, लोकांच्या मनात, कल्पनेत आज मुस्लिम म्हणून जी साधारण कल्पना आहे तीत असणारा असा हा मुस्लिम मुलतत्ववादी गट. या गटांतर्गतही खूप विभिन्नता आहे, खूप सक्रियता आहे. सैद्धांतिक दृष्ट्या आज हा गट सर्वात जास्त सक्रीय आणि प्रभावशाली आहे. या गटाने आधुनिकतेला एक आव्हान म्हणून स्वीकारले आहे. या आव्हानास प्रतिसाद देण्यात धर्मनिरपेक्षवादी गट आणि उदारमतवादी सुधाराकांचा गट अयशस्वी झाल्यामुळे इस्लामवर आधारित शासनप्रणाली आणण्याची हा गट आपली जबाबदारी मानतो. अशी शासनप्रणाली जी आधुनिक जगात पाश्चात्य जगताशी टक्कर घेऊ शकेल. यांच्यामते इस्लाम हा मूलतः भांडवलशाही किंवा समाजवाद या पाश्चात्य संकल्पनापेक्षा श्रेष्ठ आहे. हा गट अरब आणि मुस्लिम देश ज्यांनी पूर्णतः किंवा अंशत: पाश्चात्यांचे अनुकरण केले त्यांच्या असफलतेचा हवाला देत इस्लामच्या मुलतत्वांवर आधारित अशी प्रणाली विकसित करण्याचे ध्येय राखतो. प्रेषितांच्या वेळची आदर्श नैतिक व्यवस्था या गटास अभिप्रेत आहे आणि या व्यवस्थेचे हे पुरस्कर्ते हेच या व्यवस्थेस कार्यान्वित करणारे शास्तेही आहेत. ही विचारसरणी सर्व मुस्लिम जगतात गेल्या ३०-४० वर्षात लोकप्रिय झाली आहे.
भारतातील मुस्लिम समाजात हे चारही विचारप्रवाह दिसून येतात परंतु गेल्या दोन दशकात तिसऱ्या आणि चौथ्या विचारप्रणालीचा प्रसार जोमाने होत चालल्याचेही निरीक्षण आहे. अगदी स्थानिक पातळीवर भाषा, परिवेष आणि धार्मिक चालीरीतींचे कट्टर पालन यातून हा प्रवाह दिसून येतो. हिंदू मुलतत्ववादी राजनीतीपासून संविधानधिष्ठित विचार आणि संसदीय कार्यप्रणालीला जेवढा धोका आहे, तितकाच धोका या प्रवाहापासूनही आहे . या विचारप्रवाहाचे संघटित रूप काय असू शकेल आणि ते कसे व्यक्त होईल याचा अंदाज व्यापक पातळीवर अजून येत नाही कारण हिंदुत्ववादी राजकारण आणि त्याला प्रतिवाद यात सगळ्या पुरोगामी शक्ती केंद्रित झालेल्या दिसत आहेत आणि आताच्या घडीला मुस्लिम समाज हा receiving end ला आहे , त्याचे दमन आणि शोषण होत आहे, आणखी होईल पण त्याची प्रतिक्रियाही येईल आणि ती नक्कीच सकारात्मक नसेल कारण त्याला घडवणारा मुख्य प्रवाह हा चौथ्या गटातील असेल .
या सर्वातून पुढचा मार्ग काय हा खरा आताच प्रश्न आहे आणि एक सैद्धांतिक बैठक म्हणून काही विचार आणि ज्यांनी ते विचार मांडले त्या व्यक्ती मार्गदर्शक म्हणून आहेत . जगभरच्या वैकल्पिक समाजरचनेचे काम करणाऱ्या लोकांपुढे गांधीं आणि बुद्ध तत्ववेत्ता म्हणून आदर्श आहेत . भले त्यांच्या जन्म व कर्म भूमीत त्यांचे योगदान व्यापक प्रमाणावर हिनवले जात असले तरी त्या विचाराचे आकर्षण आणि त्यातून असंख्य छोटे मोठे प्रयोग वैयक्तिक आणि सांघिक स्तरावर चालू आहेत. त्यांच्या जोडीला नेहरूंची धोरणात्मक दूरदृष्टी जोडून नव्या परिप्रेक्ष्यात आधुनिकता आणि धर्मनिरपक्ष राष्ट्राची परिकल्पना मांडायला हवी आहे. पाश्चिमात्य देशांनी औद्योगिक आणि राजकीय क्रांतीच्या प्रक्रियेतून नवीन संसदीय कार्यप्रणाली दिली परंतु बऱ्याच अंशी आध्यात्मिक आणि सामाजिक पातळीवर आपल्याकडे जसे मंथन झाले आहे तसे या समाजात झालेले दिसत नाही . अजूनही सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर चर्च ही जीवनाच्या सर्व अंगांचे नियमन आणि नियंत्रण करणारी संस्था आहे आणि त्याचे पुनरुज्जीवन होत आहे. भौतिक पातळीवर खूप सुधारणा झाल्या असल्या तरी त्यातून निर्माण झालेल्या व्यक्तिवादाने एक प्रकारचे रितेपण या समाजात भरले गेले आहे आणि चर्च आणि धर्माधारित राजनीती ही त्या पोकळीला भरून काढण्याचा एक मार्ग होत चालली आहे. जागतिक पातळीवर पाश्चिमात्य राष्ट्रांची युती बघितली तर त्यातला धार्मिक समान धागा आणि त्यात गुंतलेले त्यांचे हितसंबंध स्पष्ट दिसून येतात. देशादेशातले संघर्ष हे इराक , लिबिया , येमेन असे न राहता इस्लाम / मुस्लिम विरुद्ध पाश्चिमात्य / ख्रिस्ती देश अशी सरळ विभागणी दिसून येत आहे. या सगळ्या वेडेपणाला वेसण घालण्याची वैचारिक दृष्टी ६० वर्षाआधी नेहरूंनी अलिप्ततावादी गट स्थापून केली होती, त्या विचारांची आणि त्यावर आधारित समाज आणि राजकारणाची सैद्धांतिक मांडणी करणे आणि त्यावर आधारित चळवळ उभारणे हे सगळ्या डोकं शाबूत असलेल्या माणसांपुढचे आव्हान आहे. अशा प्रकारची मांडणी आणि कृती हे आजच्या अधिक अधिक हिंसक बनत चाललेल्या, युद्धखोरीने ग्रासलेल्या जागतिक पटलावर एक विकल्प म्हणून पुढे येणे आणि त्या दृष्टीने स्थानिक पातळीवर काम उभे करणे ही काळाची नितान्त गरज आहे 

April, 11th, 2017

East Ham



East ham, a suburb in eastern London known for the variety of Indian restaurants, temples, shops selling clothes, jewellery, utensils..You name it and you will find an item from any corner of south Asia here. As you walk through the street , variety of nationalities, ethnicities, languages , attires are noticed. Every alternate shop specialises in some food .. Ranging from international restaurant chain to pani Puri and paanwala. Some shops here resemble as if they contain whole of famous Tulsi baug of Pune . Being stopped and directed to palmist, jyotish or some Omni potent Baba is not new here. Temples and madarasas stand by each other fast replacing old pubs in this area . Each time , i visit new shops , new restaurants are noticed . The high street has changed immensely in last 10 years now incorporating eastern European communities that are looked down upon by our Asian miliu with the same disdain as one sees in Mumbai for Bihari bhayyas . Every visit to this place, i return with happy tummy , having wholesome food and bags full of seasonal vegetables and fruits . There is something always that amuses me about this place ...At times it is a small chit chat with some shop keepers , a long forgotten item suddenly discovered in some shop, tasty dabheli, paani Puri thela or a paanshop.
Today afternoon as i walked passed the street , fragrant jusmine and jaai gazra cought my attention. I entered the shop to make a payment and noticed that it was a shop selling variety of God stationary ...Such as frames , Puja items etc. This frame was at the front..surly waiting for some baniya to buy it so one of the gods may shower the blessings!
There is something very distinct in the way Jesus is portrayed..This colourful picture of Jesus is very indianised version that is often seen in the homes of Goan and Mallu friends . Jesus in red, blue attire with dark black hair ..here sitting with Ganesh and a picture of Islam's worship place . A symbol of our Bollywood secularism.

लेक माझी !

लेक माझी !
जन्माला आली तेव्हापासूनच कौतुक होते सगळ्यांना आणि अगदी दुपट्यात असल्यापासून सगळ्यांनी ती माझी लेक कशी नाहीये , हे अगदी उदाहरणे , स्पष्टीकरणे देत हजारो वेळा अधोरेखित केले होते. माझं एकच उत्तर असायचे अशा वेळी , तिचा जन्म खाजगी रुग्णालयात झाला, त्या दिवशी तिथे मी एकच पेशंट डिलिव्हरी साठी ऍडमिट होते , त्यामुळे अदलाबदली , बिछडने असा काही बॉलीवूड घोळ नाहीये, माझीच लेक आहे ती . बरीच शांत , सालस आणि सुंदर आहे , हे खरं आहे आणि माझ्या लहानपणच्या माहित आणि अर्धमाहित असलेल्या सुरस चमत्कारिक कथांमध्ये ती बसत नाही , हे हि कबुल आहे , पण ती माझीच लेक आहे. आताही वीस वर्षे हाच अनुभव अगदी पदोपदी येतो. ऑफिस किंवा इतर ठिकाणी माझ्याबरोबर असली की लोकांचा पहिला उदगार , ' is that your daughter? She is so pretty !'. थोडं हसून , थोडं ठासून ,yeah she is my daughter. म्हणलं की कधी कधी ओशाळवाणं , no, you also look nice. यावर , yeah, but you never told me that before...यावर हसून , कधी विषय बदलून मग पुढच्या चौकशा होतात.
मुलगीच पाहिजे असा काही माझा आग्रह नव्हता, पण तिच्या जन्माआधी जिथे काम करायचे तिथल्या महिला मंडळात आम्ही ,' मुलगी झाले हो ' चे प्रयोग करायचो , त्यामुळे इतक्या वेळेला नसलेल्या ताल सुरात मुलगी झाली हो ची सगळी गाणी कोकलून झाली होती आणि त्या अनुषंगाने त्याच्या मागचे विचार कोळून पिऊन झाले होते त्यामुळे दुसरं काही होणं अगदी अनैसर्गिक असावं. लग्न करावं यापेक्षा कोणाशी करणार नाही आणि त्या संसारात काय चालणार नाही यावरच लहानपण ते किशोरवयात सगळी स्व - चिंतने झाली होती. या सगळ्यात फार कधी मुलाचा , आई होण्याचा विचार फारसा प्रभावी नव्हताच. लग्न केले ते पण दोघांच्या घरच्यांचा विरोध पत्करून आणि सगळ्यांनी आपल्याशी असलेले संबंध तोडले तर तो आपल्या क्रांतिकारी विचार आचारांचा परिपाक म्हणून आनंदाने स्वीकारलेला परिणाम म्हणून . त्यामुळे पारंपरिक संसारात मूल झाले पाहिजे, मुलगा पाहिजे असल्या काही भानगडींना सामोरे जायचा प्रश्न नव्हता. त्यावेळी काम , नोकरी आणि करियर यांनी पण पछाडलेले होतेच, त्यामुळे मुलाचा विचार तेव्हाही वेगळा केला नव्हताच. शिक्षण संपवून मी, ८-१० महिने काम करून असलेली सगळी कर्ज फेडून झाल्यावर पुन्हा आय ए एस व्हायच्या मनीषेनें डोके वर काढले होते. पुण्यात एका स्नेह्यांच्या घरी राहून तेव्हा पुन्हा एकदा अभ्यास करायला सुरुवात केली होती. त्यांची तेव्हा दोन - तीन वर्षाची चिटुकली अगदी बिलगून असायची. एका रविवारी दुपारी मी अभ्यास करताना माझ्या शेजारी खेळता खेळता झोपली आणि मलाही झोप लागली . थोड्या वेळाने जाग आली , तेव्हा ती इतकी शांत माझ्या कुशीत झोपली होती , तो पहिला क्षण जेव्हा खूप तीव्रतेने मूल हवं असं वाटलं होतं. जवळ जवळ २२ वर्षाआधीच्या त्या दुपारच्या वेळी त्या चिमुरडीच्या शांत चेहऱ्याने आणि ज्या विश्वासाने ती शेजारी विसावली होती त्या विश्वासाच्या जाणीवेने मला कसोटीच्या काळात बरेच बळ दिलेले आहे. तीच निरागसता मला मुलांच्या बाबतीतली जबाबदारी सक्षमतेने घेण्यास एका अर्थाने प्रेरणादायक ठरली आहे.
मनूच्या जन्माच्या आधी आणि नंतर आमचे स्वकुटुंबीय जरी जवळ नव्हते तरी मित्र मैत्रिणी , जिथे मी शिकले त्या इन्स्टिट्यूट मधल्या शिक्षिका , जिथे काम करायचे तिथले सहकारी असा प्रचंड गोतावळा होताच सोबतीला आणि आनंदात सामील, त्यामुळे कधी एकटेपणा वाटला नाही . तिच्या बारशाला एक माझी मा सोडली तर दुसरं घरचं कोणी नव्हतं , पण घर तुडुंब भरले होते आणि गेले १८ वर्षे तिच्या वाढदिवसाला ही हेच चित्र कायम राहिले आहे. एका अर्थानी मला तिचे संगोपन ज्या पद्धतीने करायचे होते , त्याला अनुकूलच ही सारी परिस्थिती होती. कुठल्याही धर्म , जात आणि समुदायाच्या परे मला जगायचे होते आणि तिला वाढवायचे होते. स्व विकासाच्या सगळ्या संधी तिला उपलब्ध करून द्यायच्या होत्या , शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन हे ध्येयही होतेच आणि गेले २० वर्षे बाकी घडामोडी असल्या तरी आयुष्य या एका सिंगल फोकस नी जगत होतो आम्ही दोघी. बरीच स्थित्यंतरे आली यात , काही आपले दुरावले, दूर गेले , माझ्या घरचे हळू हळू परत संपर्कात आणि लागेल तसे मदतीला धावून आले. नवीन ठिकाणे , नवीन संदर्भात आम्ही एकमेकींना जपत , सांभाळत मुंबई , मध्य प्रदेश , नवी मुंबई , लंडन , केंट असा प्रवास करत इथे स्थिरावलो . या सगळ्यात मला आनंदाच्या , कसोटीच्या , दुःखाच्या , निराशेच्या आणि रोजची धांदल सांभाळण्याच्या सर्व क्षणांना या लेकीने सक्रिय साथ दिली. स्वभाव म्हणा , परिस्थितीची जाणीव म्हणा, बौद्धिक आणि मानसिक परिपक्वता म्हणा , पण कधीही फालतू हट्ट , त्रास , किरकिर असं काहीच या लेकीनं माझ्या नशिबात आणले नाही . वाद विवाद भरपूर झाले आमचे -राजकीय, सामाजिक आणि आरोग्य विषयाला धरून. चौदा - पंधराच्या वयात आपली मम्मा बदलली पाहिजे या जाणिवेचे अयशस्वी रोपण करून झाले, स्वतःला आणलेले मेकअप चे रंग , नवीन फॅशन चे कपडे आधी मी बदलायला हवं म्हणून मला दाखवून आणि नंतर या दिखाव्याचा कंटाळा आला म्हणून आता टाकवत नाही , तू तरी वापर म्हणून माझ्या कपाटात ठेवून झाले . त्यानंतर माझ्या जुन्या फॅशनच्याच कपड्यांचा , कानातल्या डुलांचा नाद लागला आणि ते आपोपाप कपाटे बदलू लागले! या सगळ्यात माझ्या कामाच्या व्यापातून आणि थोड्या कंटाळ्यातून तिच्या अभ्यासाकडे माझे दुर्लक्ष झालेच - एक तर इंग्रजीत सगळे विषय त्यात निम्म्या विषयांशी माझं उभं वैर , स्वतः कधी रेटून अभ्यास केला नाही त्यामुळे स्वतःला नसलेली मूल्ये मुलांवर लादण्यातून येणारा दांभिकपणा मला झेपणारा नव्हता , त्यामुळे इतिहास आणि समाजशास्त्रे वगळली तर ती काय शिकते आहे हे मला फक्त पालक सभेत तिचे शिक्षक तिच्या कामाची स्तुती करू लागले की कळायचे , बऱ्याचदा शाळेच्या वार्षिक दिनी तिला सगळी राखीव बक्षिसे मिळाल्यावर कळायचे की असा पण विषय तिला होता आणि त्यात तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे . त्या दिवशी संध्याकाळी सेलिब्रेशन म्हणून जेवायला बाहेर गेले की मग हि सांगायची , ' एवढं मनाला लावून घेऊ नकोस, त्यादिवशी जो वाद आपण अमक्या विषयावर घातला होता , तीच तर माझी सोशोलॉजीची असाईनमेंट होती , मला दोन्ही बाजू मांडायच्या होत्या आणि तू छान काँट्रीब्युट केलंस . किंवा ओरिएण्टल पोएट्रीवर तू जे मला तू शिकलेल्या कवितांबद्दल सांगितलेस तेच तर लिहिले होते, त्यालाच मला चेअरमन्स ट्रॉफी मिळालीये. त्या ट्रॉफी मला आणखीनच छान वाटल्या तर नवल नव्हते. अशी माझी लेक -- बारा तेरा वर्षांपासून अभिजात साहित्य, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र , इतिहास कला या विषयात रमणारी, घरची आणि बाहेरची सगळी कामे जबाबदारीने सांभाळणारी, माझ्या कामात मला वेळ मिळत नाही म्हणून छोट्याच्या सगळ्या हॉबी , शाळेचे कार्यक्रम सांभाळणारी आणि कधी मधी माझी आई बनायचा प्रयत्न करून दमात घेणारी ...
नात्यागोत्यात फार रमलो नाही पण नानी , मावशांच्या घरी थोड्या सहवासातच सगळ्यांची लाडकी, वर्षानु वर्षे भेटी झाल्या नाहीत तरी आपली मुळे जाणून घ्यायची ओढ आहेच . स्वतःची स्वतःला ओळख होण्यातला हा पहिला टप्पा , खूप प्रश्न मग गप्पा गोष्टी आणि त्यातून जसे उमजेल , समजेल तसा स्वतःचा मी कोणचा प्रवास . यात सुरुवातीचे कुतूहलाचे प्रश्न जाऊन , थोडे तिरकस प्रश्न यायला लागले तेव्हा जाणवले की काहीतरी वेगळं पाणी मुरतंय . बऱ्याच वेळा हसत खेळत विचारलेल्या प्रश्नाचे अनपेक्षित रित्या एक दिवस उत्तर आले . माझा बॉयफ्रेंड आहे आणि मी त्याला घरी बोलावू का ? कोण , काय , कसा वगैरे झाले आणि अर्थातच स्वारी घरी आली , गप्पा झाल्या , जेवणं झाली आणि वर्ष सहा महिने त्या विषयावर जुजबी बोलणं झालं . सगळं नॉर्मलच या पिढीत , तेही इंग्लंडात आणि अजून कॉलेज चालू आहे , अभ्यासावर लक्ष आहे , मोकळं बोलते मग काय काळजी असं मनाला समजावत , त्याच्याबद्दलच्या काही न पटलेल्या गोष्टी फारशा न बोलता , मागे सारत दिवस जात होते . मग एक दिवस सुट्टीला त्याच्या घरी जाऊन आल्यावर आता त्याला पण आपल्या घरी राहायला येऊ दे असा सूर आला आणि मी लटपटले. प्रश्नांची सरबत्ती पुढे जेव्हा जेव्हा हा विषय आला तेव्हा आणि त्या सगळ्या वेळी मला पटेल असे उत्तर न देता आल्यामुळे माझी कोंडी . दोघींची घुसमट एके दिवशी ऐरणीवर आली मात्र ---
शनिवारची सकाळ , चहा झाल्यावर मला घेऊन गार्डन मध्ये अगदी समोरासमोर , आधीच मोठे असलेले डोळे आणखी मोठे करत - लेक विचारत होती , सांग मला काय प्रॉब्लेम आहे - त्याच्या जागी मुलगी असती तर तो घरी राहायला येऊ दिले असते . तुला कसली भीती वाटते ? morality चा प्रश्न असेल तर तसे सांग आणि काय morality ते हि स्पष्ट सांग . तुझ्या निम्म्या पेक्षा जास्त मैत्रिणी त्यांच्या बॉयफ्रेंड्स बरोबर तशाच राहतात आणि माझ्या इथल्या मैत्रिणी पण . भारतातलं म्हणशील तर सगळ्या तिथल्या माझ्या लहानपणच्या मैत्रिणी ज्यांना तू हि ओळखतेस त्या सगळ्यांचे बॉयफ्रेंड्स आहेत आणि लिविंग इन नसल्या तरी त्यांच्या रिलेशनशिप तू किंवा अमकी तमकी मावशीची जशी होती , तशी निश्चितच नाहीये . अभ्यासाचं म्हणशील तर तुला कधी त्याची काळजी मी करू दिली नाही आणि मला माझ्या , अभ्यासाच्या , घरच्या जबाबदाऱ्यांचं भान आहे . आणि बॉयफ्रेंड म्हणजे फक्त सेक्ससाठी हपापलेले आणि नाजूक वय बीय असं काही नाहीये. तुझ्यापेक्षा या विषयाची जास्त शास्त्रीय माहिती मला आहे , त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या हि मला समजतात कारण आठवी - नववी पासून आमच्या वर्गात कोणीतरी गरोदर मुलगी आहे आणि सगळ्या सुविधा मिळत असल्या तरी त्यांची होणारी फरफट मी बघितलेली आहे . आमच्या दोघांचे खूप इंटरेस्ट कॉमन आहेत आणि एकमेकांसोबत वेळ घालवायला आम्हाला आवडते. तो दुसऱ्या शहरात राहतो त्यामुळे रोज भेटता येत नाही म्हणून सुट्टी असेल तेव्हा एकत्र राहायला काही हरकत नसावी असं मला वाटतं . सांग आता तुझा नक्की आक्षेप कशाला आहे ते? --गेले सहा महिने या विषयावर अनेक पैलूनी बोलणे झाल्यामुळे मला कुठलाच मुद्दा खोडता येत नव्हता . सगळ्या समाजशास्त्रीय संकल्पना अगदी लहान वयापासून संभाषणात असल्यामुळे आणि संदर्भासहित स्पष्टीकरणावर आधारित सर्व चर्चा , त्यात भाषेवर प्रभुत्व त्यामुळे इतर वेळी आता मी दमलीये , नको परत तीच चर्चा अशी काही पळवाट ही नव्हती . मला जे वाटत होतं ते खरं होतं की मला एक तिऱ्हाईत व्यक्ती , जी तिला खूप प्रिय होती , ती घरात येऊन राहणे नको होते . यावर तुझे कित्येक मित्र , मैत्रिणी येऊन राहतात तेव्हा आम्ही नाही का ऍडजस्ट केलं , मुळात त्यांना कधी परकं मानलं नाही , हा मुद्दा आलाच . शेवटी वैतागून म्हणले , हे बघ हे घर मला चालवायचं आहे आणि त्यासाठी काही नियम, काही बाऊंड्रीज मला ठरवाव्या लागतील आणि त्यामुळे मला कम्फर्टबेल नाही वाटत आहे तू विचारत आहेस ते . यावर दोन मिनिटे शांत राहून- म्हणजे हे घर माझं नाही , ठीक आहे , असं म्हणून आमची मिटिंग संपवून गेली आपल्या रूममध्ये . असं काही मला म्हणायचं नव्हतं आणि अभिप्रेतही नव्हतंच पण तोंडातून निघून गेलं त्याला उशीर झाला होता . मुख्य परीक्षेच्या दोन महिने आधी लेकीचा घर सोडायचा निर्णय पक्का झाला होता . काही बोलणं , रागावणं , थोडे जमतील तसे नाटकी बॉलीवूड डायलॉग ( हे दोन्हीकडून असतात, काही सुचले नाही कि , भावनेचा अडसर नसतो यांना, आपसूक सुचतात) सगळं करून झाले , पण तिसऱ्या दिवशी पॅक करून , गळ्यात पडून निरोप घेतला . मधल्या दोन दिवसात थोडं सामोपचाराने घ्यावे म्हणून तिच्या मधून मधून येणाऱ्या तक्रारीवजा आरोप ऐकून अगदी हतबल व्हायला झाले होते. इतकी वर्षे आपण एका वेगळ्याच फसव्या जगात राहत होतो की काय , का खरंच आपण हिची आबाळ केली असे वाटायला लागले होते. राग तर नव्हताच पण बोलताही न येणे इतःपर बोलून झाल्यावर , तीच म्हणाली हे सगळं आपल्या दोघींसाठी फार त्रासदायक आहे , याची जाणिव आहे मला , पण हे बोलायलाच हवे, आता नको, मी सगळं लिहून पाठवेन. जायच्यावेळेस अर्धा तास सगळेच सुन्न अश्रू गाळत होतो , फक्त माहीचा टाहो काही थांबत नव्हता .
पुढचे चार दिवस अगदी सुनसान होते , आवाज आला तर तो माहीच्या हुंदक्यांचा किंवा खूप रडून दमून झोपल्यावर सुस्कारण्याचा. मग शाळा , ऑफिस सुरु झाले , हळू हळू जवळच्या मैत्रिणींशी, बहिणींशी बोलले , प्रत्येक जण आपापल्या परीने विश्लेषण करत सांत्वनाचा प्रयत्न करत होता , जितक्या संमिश्र भावना माझ्या होत्या त्याच्या दुप्पट प्रतिक्रिया आल्या , कोण म्हणाले तिच्यावर खूप अकाली जबाबदारी होती, कोणाला प्रचंड राग, इतकं आयुष्यभर तू तिचं केलंस आणि आता असं सोडून गेली, कोण म्हणे बापाचं प्रेम नाही मिळालं , तुझ्या सगळ्या स्थित्यंतरात तिची आबाळ झाली ई . इ . काय खरे , किती खरे कोण जाणे पण जेव्हा अशी काही दुःखाची वेळ येते तेव्हा बरेच जण आपली पण , व्यथा व्यक्त करत असतात. या निमित्ताने बऱ्याच मैतरणी , नातेवाईक यांनी आपापली कहाणी ऐकवली , जितकी नाती तितक्या कथा . एकदा ऑफिसच्या मीटिंगमध्ये केस डिस्कशन मध्ये काहीतरी आठवले आणि आणि डोळे भरून आले , सगळ्या टीम मध्ये कळले , तिथेही बऱ्याच जणांनी त्यांचे मन मोकळे केले . हे सगळे ऐकताना एक गोष्ट जाणवली ,'देख के दुनिया की होली ( ओरिजिनल दिवाली ), दिल मेरा चुपचाप हुआ ... लेकीचं बंड फार काळ टिकले नाही . दोन आठवड्यांनी घरी आली काही तास , जेवली , बोलली , पुढचे प्लॅन सांगितले आणि परत गेली . दोन तीन आठवड्यांनी येणं होत राहिलं , एक दोन दिवस , मग चार , आठ असं करत आता येते वेळ काढून . मधल्या काळात सगळ्या परीक्षा सर्वोच्च नंबरांनी पास झाली , हव्या त्या युनिव्हर्सिटी मध्ये हव्या त्या विषयात स्कॉलरशिप मिळवून ऍडमिशन नक्की केले , मग एवढ्यात तीन वर्षाचा आणि एकूणच करियर करायचा निर्णय होत नाहीये म्हणून एक वर्ष गॅप वर्ष घेतले. नऊ महिने नोकरी केली , वर्षभराचा खर्च निघेल एवढी बँकेत जमा ठेवून चार पाच देश फिरून आली . आता ऑकटोबरला सुरु करेल डिग्रीचा अभ्यास. सगळ्या विद्यापीठांचा तुलनात्मक अभ्यास , तिथे राहण्याचा खर्च , डिग्रीच्या मोड्युलमध्ये काय विषय आहेत , त्यांचा पुढे करियर मध्ये काय उपयोग हेही सगळे तिथे जाऊन करून आलीये आणि पुढे काय करायचंय हेही बरंच स्पष्ट आहे .
यावर्षी ईस्टर ला वर्ष झालं आमच्यातल्या त्या तणावपूर्ण ताटातुटीला . सुरुवातीचं दुःख पचवत एकेक गोष्ट अलगद उलगडायला लागलीय . तेव्हा जे काही वाटलं - तिचं नातं , घर , माझी ऑथॉरिटी नाकारणं , स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणं , त्यातून निघालेले वेगवेगळे अन्वयार्थ , आलेली विमनस्कता, अगतिकता आणि तिच्याशिवाय हळूहळू बसलेली माझ्या जीवनाची घडी .. यातल्या सगळ्या भावना , अर्थ आपापल्या परीने काही अंशी बरोबर होते पण आता वर्षभरानंतर कळलेली एकच गोष्ट -- हे होणं साहजिक होतं . माझं आणि तिचं जगलेलं जिणं कशाही प्रकारचं असलं तरी तिचं स्वतंत्र होणं , जी काही ऑथॉरिटी आहे , आणि तिच्या आयुष्यात कितीही समंजस असले तरी मीच ती ऑथॉरिटी होते , त्याविरुद्धच तिचं बंड करणं हे तिच्या नवीन अस्मितेच्या शोधायला पहिला टप्पा होता . माझ्याविरोधात जे जे तिला तेव्हा वाटलं ते त्या क्षणी जायज होतं कारण तिला त्या metamorphosis साठी लागणारी ऊर्जा कशाला तरी जोरदार नकार म्हणून येणाऱ्या प्रतिक्रियेतूनच येणार होती .
आताच गेली दोन आठवडे राहून , काही पूर्वीची मनू तर बरीचशी बदललेली आताची ही तरुणी मनू . छान वेळ गेला एकमेकींच्या संगतीत , लांबवर फिरून आलो , वाटेत दिसणाऱ्या अनेक नमुन्यावर यथेच्छ टीकाटिपण्णी करत खिदळत समुद्रकिनारी भटकलो . मस्त भाज्या आणून वेगवेगळे पदार्थ एकमेकांसाठी केले , तिनं पेंटिंग , माहीच गाणं आणि माझा स्वयंपाक अशा मस्त सांजा घालवल्यावर रात्री माझ्या बेडमध्ये घुसून रजई इकडची तिकडची ओढत आपापली पुस्तके वाचली. एकाच वेळी Gabriel García Márquez आणि JK Rowling बद्दल तितक्याच passionately दोघा मुलांकडून ऐकत झोप लागणं , यासारखं सुख नाही , हे पुन्हा अनुभवलं . एक शब्दही न बोलता तणावाच्या काळात आलेले मळभ दूर झालंय आणि नव्या जाणीवा , नव्या दिशा गवसलेल्या या वाढलेल्या मुलीबरोबर राहण्यात वेगळाच आनंद आहे . मोठी झाली आहे सर्वच अर्थाने , बऱ्याच गोष्टी स्पष्ट आहेत , आपली वेगळी मते ठाम मांडते आहे पण आधीचा अभिनिवेश गेला आहे , त्याजागी समंजसपणे मला असं वाटतं म्हणून मुद्देसूदपणे स्वतःला जे वाटतं ते सांगणं आणि इतरांना कदाचित का रुचणार नाही याची कारणमीमांसा करणं दोन्ही जमतंय . आणि खरं तर हे ऐकण्यात , समजण्यात इतकं गर्क व्हायला होतंय मला की आमचा दोघींचा एकाच वेळी एकमेकींशी संवाद आणि त्याचबरोबर स्वतःशी एक long epilogue चाललाय असं वाटतं.
माझ्यावरच्या आक्षेपात एक आक्षेप असाही होता की मी घरी पण फार मॅनेजर सारखी वागते आता तेच पालटून माझं घर आणि कामातलं व्यवस्थापन कसं agile आहे आणि त्यातून ती कसं काम , शिक्षण आणि तिचं रोजचं जीवन सांभाळायला शिकली हे ऐकलं की नकळत हसू येते. पण त्याचबरोबर पुढच्या चार वर्षाचं तिचं शिक्षण , logistics आणि फायनांस मॅनॅजमेण्ट बघितलं की ती तिच्या आणि माझ्या नकळत किती माझं बघून शिकली आहे आणि उगाचच सहा महिने आपण आपल्या करियर माइण्डेड वागण्याला दूषणे देत राहिलो याचे जास्त हसू येते . उच्च शिक्षणाच्या सगळ्या सोयी समोर असून हिला पुढे जाऊन शिक्षिका बनून शासकीय शाळेतच शिकवायचं आहे , याच्यामागची गरीब घरातून येणाऱ्या मुलांविषयीची कळकळ आणि तिच्या आजी आजोबांचे कामाचा जो काही तिला कळलेला आदर्श आहे , त्याबद्दल नवल वाटत नाही . जसजसा वेळ जातोय तसतसा तिच्या व्यक्तिमत्वाबरोबर आमच्या नात्याचा एकेक वेगवेगळा पैलू समोर येत आहे . एका अर्थाने आमच्या दोघींचा हा नवीन जन्मच आहे . पहिला जन्म असतो बाळ शारीरिक रित्या विलग होण्याचा , यातल्या वेदना आणि associated risks माहित आहेत पण हा दुसरा जन्मही तितकाच महत्वाचा , आपली भावनिक आणि authoritarian नाळ तोडण्याचा . पारंपरिक व्यवस्थेत एका अर्थी लग्न लावून मुलगी सासरी गेली की काही अंशी हे विलग होणं साधलं जायचं पण पूर्णतः यातून बाहेर पडता येत नाही . गेली वीस वर्षे मुलीचे संगोपन, शिक्षण यातच तसं पाहिलं तर माझं आयुष्य फिरत होतं . एकल पालकत्व काही अंशी लादलं गेलं असलं तरी त्याची खंत किंवा विषाद नव्हताच , किंबुहना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं मला , आपल्या परीने मुलांना वाढवायचं . त्यांनी त्रास दिला नाही किंवा त्यांच्या जबाबदारीचा त्रास मला झाला नाही कारण प्रत्येक टप्प्यावर मदत करणारे बरेच मित्रमैत्रिणी आणि स्वकीय मिळाले , पण तरीही एका परीने मी या जबाबदारीत बांधले गेले होते . गेल्या वर्षभरात खूप मोकळं ही वाटतंय . लेक मोठी झाली आहे आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र ही. त्या प्रक्रियेत नकळत मीही स्वतंत्र झाले आहे , तिच्या शिवाय बऱ्याच गोष्टी आधी अपूर्ण वाटायच्या आता वेगळ्या वाटतात. तिची वाटचाल अशीच स्वतंत्र चालत राहणार , संवाद मात्र चालू राहील, एकमेकींच्या स्वायत्त प्रवासांबद्दलचा, मधूनच येणाऱ्या सामायिक थांब्यांचा , नवीन वळणांचा , एकमेकींना समजण्याचा आणि त्यात स्व उमजण्याचा.
कितीही मोठी होवो , कुठेही राहो काही गोष्टी बदलणार नाहीत हे दोघीनांही पक्क माहित आहे आणि त्याच्यामागचे ठरलेले कारणही - माँ का दिल ! म्हणूनच आता दोन महिने ग्रीस , इटली तल्या कुठल्या शाळांमध्ये शिकवणार आहे , तिथले सगळे पत्ते , फोन नंबर पाठवलेत. केला तर फोन लगेच उचलणार नाही याची दोघीना खात्री आहे तरीही . किंवा जाताना खाण्यापिण्याच्या हजारो सूचना आणि आल्यावर कशी अशक्त झाली आहे यावरचे निरूपण -- हे सगळे आहे आणि तसेच राहणार . म्हणून मोठी झाली म्हणून आम्ही काही मैत्रिणी बैत्रिणी नाही होणार . कितीही स्वतंत्र , स्वायत्तपणाचा डंका पिटला तरी प्रत्येक वेळी निघाली की पोटात तुटतेच कुठेतरी - तो अदृश्य बंध अबाधितच आहे आणि तसाच राहणार - एक मुलगी म्हणून इतकी वर्षे अनुभवला होता एक आई म्हणून पुन्हा त्याचा वेगळा अनुभव आहे , वेदनादायी तितकाच सुखद ही ...

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...